प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य

 मराठवाडा मुक्ती संग्रामातील एकजूट प्रेरणादायी - प्रा. डॉ. आर्य

प्रतिनिधी परळी वैजनाथ : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी (दि.१२) सप्टेंबर रोजी उपरोक्त मत व्यक्त केले.

                शहरातील थर्मल कॉलनी परिसरातील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी लातूर येथील इतिहास तज्ञ प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यामध्ये झालेले अन्याय, अत्याचार, सामाजिक परिस्थिती व त्यामध्ये मराठवाड्यातील सामाजिक ऐक्य, तत्कालीन काळातील परिस्थिती त्यातून समाजाला मिळालेले संस्कार , दिलेला लढा व सामाजिक एकोपा याचे सुसूत्र पद्धतीने पुराव्यानिशी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्ती संग्राम यामध्ये मराठवाड्यातील जनतेचे प्रेरणादायी कार्य सांगितले. यावेळी मंचावर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ सदस्य उत्तमरावजी देशमुख , प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. हर्षवर्धन आर्य, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य अजय सोळंके सर, प्राचार्य बी.ए नाईकनवरे, प्रभारी प्राचार्य आर.एस. स्वामी, जेष्ठ प्रा.राजू कोकलगावे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजू कोकलगाव यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे यांनी तर आभार प्रा. बाळासाहेब देशमुख यांनी मानले. यावेळी प्राध्यापक वंदांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या