परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

 जालन्यातून आणखी एक एल्गार:ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निवेदने देणार 


मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

जालना । शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर पासून राज्य भर निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी.उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले, परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या मागण्या बदल बोलले नाही. या मागण्यांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने सम स्त ब्राह्मण समाज समितीच्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात सरकारला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागोचा नारा दिला आहे.


दरम्यान त्याचाच भाग म्हणूण दिनांक १७ सप्टेंबर पासुन समस्त ब्राह्मण समजाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाचा आवाज शासना पर्यंत पोहचण्यासाठी राज्यभर, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. ही माहिती मुख्य समन्वयक महाराष्ट्र दीपक रणनवरे व धनंजय कुलकर्णी, विजया कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, महेश अकोलकर, शाम कुलकर्णी, श्रीकांत जोशी, योगेश जानतीकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!