इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

 जालन्यातून आणखी एक एल्गार:ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर निवेदने देणार 


मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांची माहिती

जालना । शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी दिनांक १७ सप्टेंबर पासून राज्य भर निवेदन देणार समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी कळविले आहे

ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी.उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले, परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या मागण्या बदल बोलले नाही. या मागण्यांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने सम स्त ब्राह्मण समाज समितीच्यावतीने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात सरकारला प्रलंबित मागण्यांचे स्मरण करून देण्यासाठी जागो सरकार जागोचा नारा दिला आहे.


दरम्यान त्याचाच भाग म्हणूण दिनांक १७ सप्टेंबर पासुन समस्त ब्राह्मण समजाच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाचा आवाज शासना पर्यंत पोहचण्यासाठी राज्यभर, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. ही माहिती मुख्य समन्वयक महाराष्ट्र दीपक रणनवरे व धनंजय कुलकर्णी, विजया कुलकर्णी, प्रमोद पुसरेकर, महेश अकोलकर, शाम कुलकर्णी, श्रीकांत जोशी, योगेश जानतीकर यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट