इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

'संस्कृत दिन'

 वैद्यनाथ महाविद्यालयात 'संस्कृत दिन' साजरा



              *परळी वैजनाथ-दि.३*

                     सर्व भाषांची जननी व समग्र ज्ञान- विज्ञानाचे आगर म्हणून ओळख असलेल्या संस्कृत या प्राचीन भाषेत वैश्विक कल्याणाचे  विश्वाचे मूलभूत वैभव दडले असून या भाषेच्या अभ्यासाने मानवी जीवन धन्य होते, असे विचार प्रसिद्ध संस्कृत अभ्यासक आचार्य श्री सानंद यांनी मांडले.

        येथील वैद्यनाथ महाविद्यालयात नुकताच *संस्कृत दिन* साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ आर. डी. राठोड यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य एच.डी. मुंडे ,पर्यवेक्षिका प्रा.सौ. मंगला पेकमवार ,समन्वयक प्रा.यु. आर. कांदे उपस्थित होते. याप्रसंगी आचार्य श्री सानंद यांनी संस्कृत भाषेतील चिरंतन गुणवैशिष्ट्यांचा गौरव करून ही भाषा शिकण्यास अतिशय सोपी, सुलभ, शुद्ध, रंजक,गोड, रसपूर्ण व उच्च ज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले. ते म्हणाले- 'प्राचीन ऋषी-मुनी व साहित्यिकांनी  संस्कृत भाषेतून साहित्य सृजन करून आध्यात्मिक व भौतिक प्रगती साधण्याचा मूलमंत्र दिला. आजच्या आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे मूळ देखील संस्कृत भाषेतच दडले आहे.' अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.राठोड यांनी नवीन शैक्षणिक धोरणात संस्कृत भाषेला अत्यधिक महत्त्व येणार असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी या विषयातील सखोल ज्ञान आत्मसात करून सकारात्मक वाटचाल करावी असे आवाहन केले.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.डॉ. नयनकुमार आचार्य यांनी तर सूत्रसंचालन कु. पूजा नेमाने हिने केले.  प्रारंभी आनंद चाटे, गिरिजा गोस्वामी, पल्लवी औटी, रागिनी बोकन, वैष्णवी कदरे यांनी संस्कृत श्लोकगायन केले. तर शेवटी राहुल औटी याने आभार मानले. या प्रा.डा. एक.आर. चव्हाण, प्रा.डा.व्ही व्ही आर्य, प्रा .गया नागराव,प्रा. शेटे,प्रा. बिडकर, प्रा.गुट्टे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या