इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू

 आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात; दोन पॅसेंजर गाड्या एकमेकांवर आदळल्या, 6 जणांचा मृत्यू



आंध्र प्रदेशात मोठा रेल्वे अपघात घडला आहे. येथे विजियानगरममध्ये रविवारी दोन गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनमध्ये ही टक्कर झाली. बचावकार्य सुरू असल्याचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी सांगितले. याशिवाय एनडीआरएफच्या पथकांचीही मदत घेण्यात आली आहे. 

एएनआय या वृत्तसंस्थेने अपघाताची काही फोटो ट्विटवर शेअर केले हेत. घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असून काही डबे रुळावरून घसरल्याचे दिसून येते. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना जखमींना नेण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे
पंतप्रधानांनी घेतला परिस्थितीचा आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. पीएमओने सांगितले की, अधिकारी जखमींना लोकांना शक्य ती सर्व मदत करत आहेत. पंतप्रधानांनी या अपघातात मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, अपघातस्थळी अंधार असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद घटनास्थळी पोहोचले आहेत. ते म्हणाले की, बचावकार्य सुरू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि अपघात निवारण गाड्या दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफची टीमही अपघातस्थळी रवाना झाली आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या