प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित; शासनाकडे केल्या आठ मागण्या

 सकल मातंग समाजाच्या वतीने परळीत भव्य आक्रोश मोर्चा




मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित; शासनाकडे केल्या आठ मागण्या


परळी (प्रतिनिधी)

परळी विधानसभा मतदार संघातील सकल मातंग समाजाच्या वतीने परळीत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सहभागी विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे येऊन उपविभागीय कार्यालय येथे धडकला. लाल झेंडे हाती घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थिनी, महिला आणि समाज बांधवांच्या घोषणांनी शहर दणाणून निघाले. 


मंगळवार दि .१० ऑक्टोबर २०२३ रोजी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सकल मातंग समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला विविध प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यात प्रामुख्याने  सरकारने तात्काळ खाजगीकरण थांबवावे, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद शाळा दत्तक योजनेखाली खाजगीकरण करण्याचे ठरवले आहे. तो जी आर तात्काळ मागे घेण्यात यावा, साहित्य रत्न आण्णाभाऊ यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक वाटेगांव या ठिकाणी उभारण्यात यावे, ऊसतोड कामगारांना प्रति टनाला ५०० रुपये भाव देण्यात यावा, निराधार व श्रावणबाळ योजनेचे प्रलंबीत असलेले प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावे व त्यांना प्रति महिना ३ हजार रुपये वेतन देण्यात यावे, वाढत्या महागाई नुसार पंतप्रधान घरकूल आवास योजना व रमाई आवास योजनाच्या प्रति घरकुलाला ५ लाख रुपये देण्यात यावे, ऊस तोडणी कारखान्याला जाणाऱ्या प्रत्येक कुटूंबाला सहा महिण्याचे रेशन त्यांना एकाच वेळी देण्यात यावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्या सरकारने मान्य कराव्या अन्यथा आम्ही सरकारला मतदारसंघात फिरकू देणार नाहीत असा इशारा आंदोलनात सहभागी मातंग समाज बांधवांनी दिला आहे. या आक्रोश मोर्चात मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने महिला, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या