इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

ग्रामसेवकांनी बांधकाम कामगाराबाबतचे मुख्यकार्यकारी अधिका-यांचे पत्र नोटीस बोर्डवर लावावे - प्रा.बी.जी.खाडे

 ■ ग्रामसेवकांनी बांधकाम कामगाराबाबतचे मुख्यकार्यकारी अधिका-यांचे पत्र नोटीस बोर्डवर लावावे - प्रा.बी.जी.खाडे


परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

 

      परळी वैजनाथ  तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  26 सप्टेंबर 2023 रोजी बांधकाम कामगारांबाबत काढलेले पत्र ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर  कायमस्वरूपी लावावे अशी लेखी सुचना काढावी अशी मागणी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्याकडे केली आहे.


          26 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकास काढलेल्या पत्रात ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना काम केल्याची खात्री करून घेऊन मागील वर्षात 90 दिवस किंवा  जास्त दिवस काम केल्याचे पत्र मंडळास नोंदणीसाठी द्यावे असा आदेश दिला आहे. कामगाराने गुतेदाराकडे 90 दिवस  काम केल्याचे प्रमाणपत्राची गरज नाही. रोज वेगळ्या मालकाकडे काम करावे  लागत असलेल्या बांधकाम कामगारास ग्रामीण भागात ग्रामसेवकाने प्रमाणपत्र द्यावे. असा सी.ओ.च्या पत्राचा स्पष्ट अर्थ असूनही ग्रामसेवक अनावश्यक कागदपत्राची कामगारांना मागणी करतात व कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे सांगतात . ग्रामसेवकाच्या असहकार्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची योजना खऱ्या सामान्य बांधकाम कामगाराकडे पोचली नाही. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास सुचना दिल्या आहेत व गटविकास अधिका-यांनीही सुचना दिल्या आहेत. तरीही ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाहीत. 


         ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राची माहिती व्हावी म्हणून ते पत्र ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या नोटिस बोर्डवर कायमचे लावून सांभाळले पाहिजे अशी मागणी प्रा. बी.जी.खाडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या