दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

ग्रामसेवकांनी बांधकाम कामगाराबाबतचे मुख्यकार्यकारी अधिका-यांचे पत्र नोटीस बोर्डवर लावावे - प्रा.बी.जी.खाडे

 ■ ग्रामसेवकांनी बांधकाम कामगाराबाबतचे मुख्यकार्यकारी अधिका-यांचे पत्र नोटीस बोर्डवर लावावे - प्रा.बी.जी.खाडे


परळी वैजनाथ: प्रतिनिधी....

 

      परळी वैजनाथ  तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  26 सप्टेंबर 2023 रोजी बांधकाम कामगारांबाबत काढलेले पत्र ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर  कायमस्वरूपी लावावे अशी लेखी सुचना काढावी अशी मागणी बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी खाडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांच्याकडे केली आहे.


          26 सप्टेंबर 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकास काढलेल्या पत्रात ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना काम केल्याची खात्री करून घेऊन मागील वर्षात 90 दिवस किंवा  जास्त दिवस काम केल्याचे पत्र मंडळास नोंदणीसाठी द्यावे असा आदेश दिला आहे. कामगाराने गुतेदाराकडे 90 दिवस  काम केल्याचे प्रमाणपत्राची गरज नाही. रोज वेगळ्या मालकाकडे काम करावे  लागत असलेल्या बांधकाम कामगारास ग्रामीण भागात ग्रामसेवकाने प्रमाणपत्र द्यावे. असा सी.ओ.च्या पत्राचा स्पष्ट अर्थ असूनही ग्रामसेवक अनावश्यक कागदपत्राची कामगारांना मागणी करतात व कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचे सांगतात . ग्रामसेवकाच्या असहकार्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची योजना खऱ्या सामान्य बांधकाम कामगाराकडे पोचली नाही. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकास सुचना दिल्या आहेत व गटविकास अधिका-यांनीही सुचना दिल्या आहेत. तरीही ग्रामसेवक प्रमाणपत्र देत नाहीत. 


         ग्रामीण भागातील सर्व बांधकाम कामगारांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राची माहिती व्हावी म्हणून ते पत्र ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतच्या नोटिस बोर्डवर कायमचे लावून सांभाळले पाहिजे अशी मागणी प्रा. बी.जी.खाडे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....