दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

शांतता राखा : शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचे आवाहन

 उद्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक



बीड, प्रतिनिधी......
         बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उद्या दि. ३१.१०.२०२३ रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.

                 मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण अंतरवली सराटी ता. अंबड जिल्हा जालना येथे सुरू केलेले आहे. उपोषणादरम्यान त्यांची आज रोजी प्रकृती खालवली असल्याचे सूत्रांकडून समजलेले आहे.या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्यता असल्याने, व काही समाजकंटक मराठा समाजाच्या नावाचा गैरवापर करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांचे शांततापूर्ण आंदोलन भरकटावे आंदोलनास हिंसक वळण लागावे या दुषित हेतूने काही लोक मराठा आंदोलनाच्या नावावर जाळपोळ व हिंसक घटना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सामाजिक शांतता प्रस्थापित व्हावी तसेच शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये व शांततेच्या मार्गाने चाललेले मराठा आंदोलन शांततेच्या मार्गाने पुढे चालावे, या हेतूने मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्हा च्या वतीने उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्हा बंद ची हाक देऊन बंदला सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने बंदमध्ये सहभागी होऊन सदरचा बंद शांततेत
लोकशाहीच्या मार्गाने यशस्वी करावा असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा बीड जिल्ह्याच्या वतीने  करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....