•••••••••••••••
दर्जा व विश्वासपूर्ण माहिती -आपल्या हक्काचे व्यासपीठ -प्रत्येकाची 'माझी बातमी'
•••••••••••••••
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
परळीत दिव्यांग बांधवांना गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमुळे मिळाला लाख मोलाचा आधार!
वंचितांसाठी काम करण्याचे संस्कारच समाजोपयोगी कार्यासाठी ऊर्जा देतात - खा. प्रितम मुंडे
पूर्व तपासणी शिबिरातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे मोफत वितरण
परळी वैजनाथ।दिनांक २०।
वंचित, पिडितांची सेवा करण्याचे संस्कार आमच्यावर आहेत, हेच संस्कार आम्हाला समाजोपयोगी काम करण्याची उर्जा देतात. तथापि, राजकारणातील व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मला 'पांढऱ्या पेशी' व्हायला आवडेल असं खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी येथे सांगितले.
केंद्र सरकारचा सामाजिक कल्याण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील दिव्यांग बांधवांना खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते आज सहाय्यक साधनांचे मोफत वितरण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी आम्ही पूर्व तपासणी शिबीर आयोजित केले होते. या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना त्यांचे जीवन कष्टमुक्त करणारे सहाय्यक साधने वाटप करताना आनंद होतो आहे. केंद्र सरकारच्या कंपनीकडून दिव्यांगांसाठी चांगले दर्जेदार आणि टिकावू साहित्य मिळाले आहे. यामुळे दिव्यांग लोकांचा दैनंदिन जीवनातील संघर्ष कमी होईल.
जेंव्हा आम्ही जिल्ह्यासाठी समर्पित भावनेने काम केले तेंव्हा तेंव्हा लोकांनीही आम्हाला त्याची पोचपावती दिली. प्रामाणिकपणे केलेल्या कार्याला लोकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिल आहे. यात कुठेही राजकारण अथवा मतपेटी डोळ्यासमोर ठेवून राजकारण केल नाही असं त्या म्हणाल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेमुळे दिव्यांगांना सन्मान मिळाला आहे, दिव्यांग व्यक्ती म्हणजे एका विशिष्ट आणि दिव्यशक्तीने आपल दैनंदिन जीवन जगत असतात, त्यांच्या या शक्तीला समर्पक नाव देऊन मोदीनी त्यांचा सन्मान केला असल्याचे खा. प्रितमताई म्हणाल्या.
दिव्यांगांना लाख मोलाचा आधार
---------
या कार्यक्रमास गोरख मस्के, परशुराम टापके, सरताज खान, मीनाताई ठाकूर, विजय कोटरलवार, सूर्यकांत कुल्हाटे, अनिता शेरकर, सय्यद खान मेहताब खान आदी दिव्यांग बांधवांना सहाय्यक उपकरणांचे प्रातिनिधिक स्वरूपात निःशुल्क साहित्य वाटप करण्यात आले. पूर्व तपासणी शिबीरात सुमारे २२५ लाभार्थी पात्र ठरले आहेत, त्यांना विविध साहित्य वितरीत करण्यात आले. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन राबविलेला हा उपक्रम दिव्यांगांसाठी लाख मोलाचा आधार ठरला.
कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते राजेश देशमुख, डाॅ. हरिश्चंद्र वंगे, उप जिल्हा रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ अरूण गुट्टे, उत्तमराव माने, दत्ता कुलकर्णी, नारायण सातपुते, राजाभाऊ दहिवाळ, डाॅ. शालिनीताई कराड, रेशीमनाना कावळे, शेख अब्दुल करीम, विलास मुंडे आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा. अजय गिते व ज्ञानोबा सुरवसे यांनी केले.
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भिषण आपघात घडला असुन परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.एकावर उपचार करण्यात येत आहेत. अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले.या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी,रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली,शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडू...
*करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात ...
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी... शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढ...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा