संतापजनक घटना

इमेज
  साडेतीन वर्षाच्या बालिकेवर ६५ वर्षीय वृद्धाचा अत्याचाराचा प्रयत्न केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे एका ६५ वर्षीय नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. ही घटना १२ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीची आई कामावर गेलेली असताना, संशयित आरोपीने चिमुरडीच्या पाच वर्षांच्या भावाला खाऊचे आमिष दाखवून दुकानात पाठवले आणि त्यानंतर मुलीला आपल्या घरात बोलावून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने मुलगा दुकानातून परत आल्यावर बहीण न दिसल्याने त्याने घरात असलेल्या आजारी वडिलांना याची माहिती दिली. वडिलांनी शोध घेतला असता शेजाऱ्याचे घर बंद असल्याचे पाहून त्यांना संशय आला. आवाज देऊन घर उघडले असता संशयित आरोपी आणि मुलगी घरात मिळून आले. यावेळी नराधमाने मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोल...

दीपक रणनवरे यांनी दिली माहिती

 समस्त ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात जालना येथे आमरण उपोषण

जालना- (प्रतिनिधी)

शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत नोव्हेंबर महिन्यात मागण्या मान्य होईपर्यंत जालना येथे दीपक रणनवरे  हे आमरण उपोषण करणार. अशी माहिती समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे  मुख्य समन्वयक दीपक रणनवरे व धनंजय कुलकर्णी यांनी कळविले आहे .


*ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी.*

 *उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे.*

 *प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. व परशुराम भुवन उभारण्यात यावे* 

*पौरोहित्य करणाऱ्या बंधूना दर महा 5000 मानधन देण्यात यावे*

 यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज  समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात  सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले,परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या मागण्या बद्ल बोलले नाही.या मागण्यांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने समस्त ब्राह्मण समाज  समिती च्यावतीने नोव्हेंबर महिन्यात जालना येथे आमरण उपोषण करणार आहे ही सर्व माहिती प्रत्येक गावात देऊन  समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाचा आवाज शासना पर्यंत पोहचण्यासाठी राज्य भर,  बैठकांचे आयोजन करुन उपोषणा बदल माहिती देण्यात येणार आहे. हि माहिती मुख्य समन्वयक महाराष्ट्र दीपक रणनवरे  धनंजय कुलकर्णी सौ. विजया कुलकर्णी श्रीकांत जोशी  संजय देशपांडे महेश अकोलकर,शाम कुलकर्णी  योगेश जानतीकर  डॉ संजय रुईखेडकर  अजिंक्य पांडव मंदार कुलकर्णी, आलोक चौधरी, अनिल डोईफोडे,दत्ता महाजन गणेश लंके प्रसन्ना कुलकर्णी  सुशिल कुलकर्णी पंकज कुलकर्णी बाबासाहेब कुलकर्णी विनायक कुलकर्णी विनायक अहंकारी, प्रमोद कुलकर्णी  इंद्रजित इनामदार मधुसूदन दंडारे हे सर्व महाराष्ट्रात महीती देणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....