इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दीपक रणनवरे यांनी दिली माहिती

 समस्त ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात जालना येथे आमरण उपोषण

जालना- (प्रतिनिधी)

शासन-प्रशासन दरबारी खितपत पडलेल्या व दुर्लक्षित असणाऱ्या ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत नोव्हेंबर महिन्यात मागण्या मान्य होईपर्यंत जालना येथे दीपक रणनवरे  हे आमरण उपोषण करणार. अशी माहिती समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे  मुख्य समन्वयक दीपक रणनवरे व धनंजय कुलकर्णी यांनी कळविले आहे .


*ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात यावी.*

 *उच्च शिक्षण मोफत देण्यात यावे.*

 *प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे. व परशुराम भुवन उभारण्यात यावे* 

*पौरोहित्य करणाऱ्या बंधूना दर महा 5000 मानधन देण्यात यावे*

 यासह इतर विविध मागण्यांसाठी समस्त ब्राह्मण समाज  समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून शासन-प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे, अनेकवेळा आंदोलने करुन, निवेदने देऊन ही सरकारने दुर्लक्ष केले. या संदर्भात  सर्वच राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार मंत्री पालकमंत्री यांना अनेक वेळेस प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले,परंतु आश्वासनाशिवाय आज पर्यंत काहीही मिळाले नाही. कोणीही समाजच्या मागण्या बद्ल बोलले नाही.या मागण्यांकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असल्याची भावना समाजाच्या मनात निर्माण झाल्याने समस्त ब्राह्मण समाज  समिती च्यावतीने नोव्हेंबर महिन्यात जालना येथे आमरण उपोषण करणार आहे ही सर्व माहिती प्रत्येक गावात देऊन  समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व समाजाचा आवाज शासना पर्यंत पोहचण्यासाठी राज्य भर,  बैठकांचे आयोजन करुन उपोषणा बदल माहिती देण्यात येणार आहे. हि माहिती मुख्य समन्वयक महाराष्ट्र दीपक रणनवरे  धनंजय कुलकर्णी सौ. विजया कुलकर्णी श्रीकांत जोशी  संजय देशपांडे महेश अकोलकर,शाम कुलकर्णी  योगेश जानतीकर  डॉ संजय रुईखेडकर  अजिंक्य पांडव मंदार कुलकर्णी, आलोक चौधरी, अनिल डोईफोडे,दत्ता महाजन गणेश लंके प्रसन्ना कुलकर्णी  सुशिल कुलकर्णी पंकज कुलकर्णी बाबासाहेब कुलकर्णी विनायक कुलकर्णी विनायक अहंकारी, प्रमोद कुलकर्णी  इंद्रजित इनामदार मधुसूदन दंडारे हे सर्व महाराष्ट्रात महीती देणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!