इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

समाज तुमच्या पाठीशी कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही - मनोज जरांगे पाटील

 आंतरवाली येथील सभे दरम्यान गेवराईच्या तरुणाचा उष्मघाताने मृत्यू ; अंत्यविधीला उपस्थित राहून जरांगे पाटीलांची श्रद्धांजली

------------------------------

गेवराई/ एमबी न्युज वृत्तसेवा 

अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे काल दि. १४ ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची विराट जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पायी गेलेल्या गेवराईतील एका 36 वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जरांगे पाटील हे अंत्यविधीला उपस्थित राहुल श्रद्धांजली अर्पण केली.

विलास शिवाजीराव पवार (वय ३५) असे मयताचे नाव आहे. मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे यासाठी १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटा येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. दरम्यान या सभेसाठी गेवराई येथील विलास शिवाजीराव पवार हा तरुण शहागड येथून पायी गेला होता. याठिकाणी त्याला जास्त प्रमाणात उलटीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याने छोटा भाऊ गणेश याला कॉल करून माहिती दिली. यानंतर तातडीने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले.  मात्र गाड्यांच्या गर्दीने रुग्णालयात पोहचायला उशीर झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

 त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली असा मोठा परिवार आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे पाटील यांनी अंत्यविधीला उपस्थित राहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.


समाज तुमच्या पाठीशी कुटुंबाला उघड्यावर पडू देणार नाही - मनोज जरांगे पाटील

---------------------

काल झालेल्या सभे दरम्यान उष्मघाताने गेवराई येथील तरुण विलास पवार यांच्या मृत्यूची बातमी रात्री उशिरा कळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंत्यविधी बाबत माहिती घेऊन सकाळी 11 वाजता गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित राहिले. यानंतर त्यांनी पवार यांच्या घरी जाऊन विलास पवार यांच्या पत्नी व तीन मुली व कुटुंबियांची विचारपूस केली. तो फक्त तुमचा मुलगाच नसून माझा भाऊ होता असे समजून त्याला सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, आपला समाज खूप मोठा आहे. या तीन मुलीचे शिक्षण व रक्षण ही समाजाची जबादारी असून आपला समाज तुमच्या कुटुंबियांना कधीच उघड्यावर पडू देणार नाही असे सांगून विलास यांचा छोटा भाऊ, आई, पत्नी व तीन मुलींसह सर्व परिवाराचे सांत्वन करत श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या