इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना

 दुष्काळाचे सावट दुर होऊ दे, बळीराजा समृद्ध होऊ दे-फुलचंद कराड





श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या दुर्गोत्सवात फुलचंद कराड यांच्या हस्ते देवीची घटस्थापना


परळी प्रतिनिधी

श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या दुर्गोत्सवात श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या हस्ते विधीवत महाआरती करुन घटस्थापना करण्यात आली. 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बालयोगी भागवताचार्य ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन  होणार आहे. नऊ दिवस विधिवत पूजाअर्चा व वाईट प्रवृत्तीच्या रावणाचे विजया दशमीच्या दिवशी दहन कार्यक्रम होणार आहे. याचा सर्व भाविक नागरिकांनी  लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत भगवानबाबा दुर्गोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी बळीराजा वरील दुष्काळाचे आलेले संकट दूर होऊ दे असे देवीला साकडे घातले.


दुष्काळी पार्श्वभूमी लक्षात घेता यंदा अत्यंत साधेपणाने दुर्गोत्सव साजरा करण्याचे श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने ठरविण्यात आले आहे. श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांच्या हस्ते विधीवत महाआरती करुन आरादी ,भजनी मंडळी महिला, परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी  घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी श्री संत भगवानबाबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष फुलचंद कराड यांनी मातेला साकडे घातले की, दुष्काळाचे हे सावट दुर होऊ दे, बळी राजा समृद्ध येऊ दे अशी मनोकामना व्यक्त केल्या.याप्रसंगी अशोक भाला. सुनिल राठी, माऊली फड, चंदकात चाटे, पंडाले, नारायण फड, पुंडकरे, माने, हरीचा चाटे, भालचंद्र बदलणे, चप्पे, कोपनर, रवि कराड, प्रशांत कराड व नाथ नगर भागातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या