इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

बीडमध्ये परिस्थिती निवळली, संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

 बीड जिल्ह्यातील संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती


बीड.....

बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आज दिवसभर जिल्ह्यात संचारबंदी होती. यावेळी सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. जिल्ह्यातील वातावरण आता निवळलं आहे. त्यामुळे प्रशासनाने संचारबंदीत उद्या सकाळी सहा वाजेपासून शिथिलता देण्याचा निर्णय घेतलाय. पण अद्यापही इंटरनेटबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही.
            बीडमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे आज दिवसभर बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता देण्यात येणार आहे.बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी याबाबत माहिती दिली. “उद्या सकाळी 6 वाजता संचारबंदीत शिथिलता केली जाईल. पण जिल्ह्यात जमावबंदी लागू असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बीड जिल्हा उद्यापासून पूर्वरत होणार”, असंही जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत.

‘शाळा, महाविद्यालये, बसेस सुरू होतील’

“उद्या सकाळी सहा वाजता संचारबंदी शिथिल होणार आहे. मात्र जमावबंदी राहणार आहे. पाच पेक्षा जास्त जणांना एकत्रित येणे बंदी असेल. सर्व शाळा, महाविद्यालये, बसेस सुरू राहतील. इंटरनेट सुरू करण्याबाबत उद्या निर्णय घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली.

‘गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार’

“कोणीही आरोप केले तरी आम्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार. तोडफोड आणि जाळपोळ झाल्यामुळे संचारबंदी लावावी लागली. संचारबंदीमुळेच उद्रेक कमी झाला”, असं जिल्हधिकाऱ्यांनी सांगितलं. “सीसीटीव्ही पाहून जो ट्रेस होईल त्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. नागरिकांनी शांतता राखावी, कायदा कोणीही हातात घेवू नये”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या