लढा गरजवंतांचा -पाठिंबा अन्य समाजघटकांचा
मराठा आरक्षणाला पाठिंबा: ब्राह्मण महिला उपसरपंचाने दिला राजीनामा
पाथरी, प्रतिनिधी.....
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता ब्राह्मण समाजातूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव पुढे येत असून पाथरी तालुक्यातील रत्नेश्वर रामपुरी (खुर्द) येथील ब्राह्मण महिला उपसरपंचांनी राजीनामा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यासाठी विविध स्तरातून अन्य समाज घटकांचाही पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे. याचअनुषंगाने पाथरी तालुक्यात मराठेत्तर ब्राह्मण समाजबांधवांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे येत पाठिंबा दिल्याचे उदाहरण समोर आले आहे. रत्नेश्वररामपुरी (खुर्द) येथील उपसरपंचपदी असलेल्या सौ. अर्चना रामराव मुळी यांनी जनभावना लक्षात घेता व मराठा समाज आरक्षण लढाईला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा