इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

लढा गरजवंतांचा -पाठिंबा अन्य समाजघटकांचा

मराठा आरक्षणाला पाठिंबा: ब्राह्मण महिला उपसरपंचाने दिला राजीनामा


पाथरी, प्रतिनिधी.....
            गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी असून यासाठी वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलने करण्यात आली आहेत. सद्यस्थितीतही मनोज जरांगे यांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा लढा सुरूच असून या लढ्याला सर्व स्तरातून सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यातच आता ब्राह्मण समाजातूनही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव पुढे येत असून पाथरी तालुक्यातील रत्नेश्‍वर रामपुरी (खुर्द) येथील ब्राह्मण महिला उपसरपंचांनी राजीनामा दिला  आहे.
        मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठीचा लढा महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सातत्याने मराठा समाज बांधवांनी याबाबत आंदोलने केली आहेत. आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आंदोलन करण्यात आले व सरकारला 40 दिवसाचा वेळ देण्यात आला होता. मात्र या वेळेत आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून गावागावात याबाबत जनसामान्य माणूस आंदोलन करताना दिसत आहे. मराठा समाजाच्या या आरक्षण लढ्यासाठी विविध स्तरातून अन्य समाज घटकांचाही पाठिंबा लाभत असल्याचे चित्र आहे. याचअनुषंगाने पाथरी तालुक्यात मराठेत्तर ब्राह्मण समाजबांधवांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे येत पाठिंबा दिल्याचे उदाहरण समोर आले आहे. रत्नेश्वररामपुरी (खुर्द) येथील उपसरपंचपदी असलेल्या सौ. अर्चना रामराव मुळी यांनी जनभावना लक्षात घेता व मराठा समाज आरक्षण लढाईला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पुढे येत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.



          एवढेच नाही तर रत्नेश्वर रामपुरी ग्रामपंचायतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून उपसरपंच व सहा ग्रामपंचायत सदस्यांनीही आपला राजीनामा सादर केला आहे. याबाबतचे सह्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पाथरी यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर उपसरपंच सौ अर्चना रामराव मुळी यांच्यासह अन्य सहा ग्रामपंचायत सदस्य उषा भास्करराव चव्हाण, महेश नारायणराव चव्हाण, सतीश पंडितराव रणेर, दिनकर नारायणराव नन्नवरे, सुलोचना बालासाहेब भरकड, रिहाना कबीर खान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या