इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

आ. कैलास गोरंट्याल यांची भेट

 दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला जालन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद: आ. कैलास गोरंट्याल यांची भेट



...............

 जालना/नांदेड :दि.29 संतोष कुलकर्णी

          परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे तसेच इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मुख्य समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते  दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून जालना शहरातील गांधी चौकात उपोषण सुरू केले आहे. बुधवारी या उपोषणाचा दुसरा दिवस होता. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. दिवसभरामध्ये विविध पक्षाच्या नेत्यांनी वकील संघाने यांची भेट घेऊन ब्राह्मण संघर्ष समितीच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.

 महाराष्ट्र राज्यातील समस्त ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करीत आहे. या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाने मोर्चे काढून आंदोलनही केले आहे. आंदोलन करूनही राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा न केल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून ( दि. २८) जालना शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नांदेड शहरातील सकल ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला. अनिल डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सौ अपर्णा हृषिकेश नेरलकर, संतोष परळीकर, संतोष कुलकर्णी, हृषिकेश नेरलकर, डॉ मुकुंद मुळे, भूषण देशमुख,लक्ष्मीकांत पांडे, भालचंद्र लाटकर, शरद शुक्ला, दुर्गादास जोशी, सुदर्शन पालीमकर ,शैलेश नागापूरकर, राजीव रावलबाजे आदींनी जालना येथे जाऊन दीपक रणवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त दिला आहे.

वंजारी सेवा संघाचे अध्यक्ष तथा जालना वकील संघाचे ॲड. संजय काळबांडे, ॲड भीमाशंकर देशमाने ,विक्रांत देशपांडे, आदिवासी महिला विकास मंडळाचे संस्थापक गोकुळ स्वामी, भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई देठे , सौ जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, परशुराम सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश संघटक प्रकाश केदारे यांनी पाठिंबा दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या वतीने दीपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दाखविण्यासाठी नांदेड येथे वेगवेगळी आंदोलने करणार असल्याचे यावेळी संतोष परळीकर व सौ. अपर्णा नेरलकर यांनी सांगितले.

ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी रास्त असून शासन दरबारी ही मागणी मंजूर व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या