इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

पंढरपूर: कार्तिकी वारी

कार्तिकीत दर्शन रांगेत भाविकांना मिळणार २४ तास चहा अन खिचडी

"सोलापूर - यंदाच्या कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगेत थांबणा-या भाविकांना मिनरल वॉटर, चहा, खिचडीबरोबर २४ तास जेवण वाटप करणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली."

"कार्तिकी यात्रेला अंदाजे १० लाख वारकरी भाविक येतात. त्यांना पुरेशा प्रमाणात सोई-सुविधा मंदिर समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दर्शनरांगेत बॅरेकेटींग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्राशेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालये, बसण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कुलर, फॅन, मिनरल वॉटर, चहा, खिचडी वाटप करण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच ४ दिवस पत्राशेडमध्ये २४ तास मोफत भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी २००० अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवक सेवा करत आहेत."

"आपत्कालीन व सुरक्षा व्यवस्थेसाठी ज्ञानदा फाऊंडेशन पुणे यांच्यामार्फत प्रशिक्षण, सोलापूर महानगरपालिकेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, चंद्रभागा नदीपात्रात आपत्ती व्यवस्थापन पथकाची नियुक्ती, अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशिन, अपघात विमा पॉलिसी आदी व्यवस्था केली आहे.देणगी घेण्यासाठी जादा स्टॉलची निर्मिती, ऑनलाईन देणगीसाठी क्युआर कोड, सोने-चांदी वस्तू दान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.


 अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती

दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविक असतात. या भाविकांसाठी दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालविणे आवश्यक आहे. त्यासाठी दर ५० मीटर अंतरावर अनुभवी पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे."

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या