प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

वैद्यनाथ महाविद्यालयात मंगळवारी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा

 वैद्यनाथ महाविद्यालयात मंगळवारी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा     


    
   

   परळी वैजनाथ, दि.१७- ‌.   ‌.   ‌.                             दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ७४ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ महाविद्यालयात  मंगळवारी (दि.१९) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

      या स्पर्धेकरिता *"आजची आंदोलने राष्ट्रहितास तारक की मारक ?"* हा विषय ठेवण्यात आला आहे. इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व वयाची मर्यादा २२ वर्षाच्या आत असलेल्या प्रत्येक महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांच्या एका संघास या स्पर्धेत सहभाग घेता येईल. संघातील एका विद्यार्थ्यास विषयाच्या अनुकूल बाजूने तर दुसऱ्या विद्यार्थ्यास प्रतिकूल बाजूने विचार मांडण्याकरिता सात मिनिटांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वाक्पटूंना रु.७००० (प्रथम), रु.५००० (द्वितीय), रु.३००० (तृतीय )  व रु.१००० (उत्तेजनार्थ) व यासोबत स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. सर्वाधिक गुण मिळवलेल्या संघास "सांघिक पारितोषिक" देण्यात येईल. महाविद्यालयाच्या सभागृहात स.१० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन संपन्न होईल,तर  दु.३ वाजता पारितोषिक वितरण होईल. स्पर्धाकांनी येथे वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे पत्र ओळखपत्र व आधार कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे.         

                        ‌                          ‌.                              तरी या स्पर्धेत सर्व महाविद्यालयाच्या संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी.राठोड उपप्राचार्य सर्वश्री डॉ. व्ही.बी. गायकवाड, प्रा. डी.के. आंधळे, प्रा. एच.डी. मुंडे, संयोजक प्रा .डॉ. नयनकुमार आचार्य (९४२०३३०१७८), सहसंयोजक प्रा.डॉ. अर्चना चव्हाण (७९७७९२६२२५), डॉ. रामेश्वर चाटे (८९९९४६१६१६)  प्रा. वाय. डी. रेड्डी (९२८४८३५७१८) , प्रा. दिलीप गायकवाड (९१६८११४४०७) यांनी केले आहे.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या