दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुचना

 संभाव्य कोरोना साथीमध्ये जनतेने काळजी घ्यावी 


बीड,दि.28 (जिमाका) : जगामध्ये JN.1 या कोरोना विषाणु मुळे जगामध्ये फ्रान्स, अमेरिका, सिंगापुर, कॅनडा, युनायटेड किंगडम, स्विडन, या देशांमध्ये या विषाणुची लागण मोठया प्रमाणात होत असल्याची दिसुन येत आहे. तसेच भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसुन येत आहे.


तरी बीड जिल्हयामध्ये कोरोना तसेच कोरोनाचा JN.1 प्रकारच्या विषाणुचा प्रसार होऊ नये म्हणुन जनतेने खालील प्रमाणे काळजी घ्यावी. जेणे करून बीड जिल्ह्यात या आजाराचा प्रसार आपणास रोखता येईल.


            गर्दीच्या ठिकाणी जात असताना सर्वांनी मास्कचा वापर करावा. प्रवाशांनी प्रवासामध्ये मास्कचा वापर करावा. घरी आल्यानंतर सर्वांनी सावणाने स्वच्छ हात धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर हात कोणत्याही पृष्ठभागास लावु नयेत. त्याचबरोबर शक्यतोवर हस्तांदोलन करणे टाळावे.  शक्यतो, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे परंतु जाणे आवश्यक असल्यांस सार्वजनिक ठिकाणी मास्क घालून जावे आणि खोकताना किंवा शिंकताना नाका-तोंडावर रुमाल किंवा मास्क असणे आवश्यक आहे.


सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर उघडयावर धुंकु नये. हातांच्या स्वच्छतेकरिता वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावेत व सॅनिटायझरचा वापर करावा. सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवुन उपचार सुरु करावेत.  सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास उपचार घेणे टाळण्यात येवु नये. लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी लोकांनी मास्क घालुन जावे, त्याठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे. तसेच सॅनिटायझर चा वापर त्याठिकाणी असावा. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचा आजार, श्वसनसंस्थेचे आजार असलेले रुग्ण यांनी वैद्यकीय सल्ला घेवुन आपले आरोग्य चांगले राहील याची काळजी घ्यावी, त्याचबरोबर वृध्द व्यक्ती, गरोदर माता, एक वर्षाच्या आतील बालके इत्यादींनी सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.


अशा सुचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. त्याचे पालन नागरीकांनी केल्यास कोरोनाचा प्रार्दुभाव थांबिण्यात येईल.


● युट्यूबवर आवश्य पहा :













टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....