इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

मराठा आरक्षण मिळत नसल्याचे नैराश्य: अंबाजोगाई तालुक्यातील युवकाची आत्महत्या

मराठा आरक्षण मिळत नसल्याचे नैराश्य:  अंबाजोगाई तालुक्यातील युवकाची  आत्महत्या



अंबाजोगाई -: मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराष्यातून आकाश काकासाहेब जाधव (वय -२५ ) रा. तडोळा,ता.अंबाजोगाई या तरुणाने स्वताच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सोमवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आत्महत्या केली.
आकाश जाधव हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने


आलेल्या नैराष्यातून आकाश जाधव याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे.अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.शेतात जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे प्रेत शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. यानंतर ही वार्ता गावभर पसरली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती बर्दापूर पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.व प्रेत पंचनामा करून शव विच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. तिथे रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. आकाश जाधव यांच्या पश्चात वृध्द आई -वडील,भवजई व एक छोटा पुतण्या आहे.

मोठ्या भावाने ही दीड वर्षापूर्वी केली होती आत्महत्या -:
मयत आकाश जाधव यांच्या भावाने दीड वर्षापूर्वी शेती पिकत नसल्याने आलेल्या आलेल्या नैराष्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे हे कुटुंब दुःखातून सावरलेले नसतानाच लहान भाऊ असलेल्या आकाश याने ही आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार गमावल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे.

मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यातील दुसरी आत्महत्या -:
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद ( वय-४२)यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली होती.त्यानंतर आज आकाश ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्या आहेत.





अंबाजोगाई -: मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आलेल्या नैराष्यातून आकाश काकासाहेब जाधव (वय -२५ ) रा. तडोळा,ता.अंबाजोगाई या तरुणाने स्वताच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन सोमवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आत्महत्या केली.
आकाश जाधव हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी सुरू असलेल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने

आलेल्या नैराष्यातून आकाश जाधव याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे.अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.शेतात जाणाऱ्या ग्रामस्थांना त्याचे प्रेत शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेले दिसले. यानंतर ही वार्ता गावभर पसरली. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती बर्दापूर पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली.व प्रेत पंचनामा करून शव विच्छेदन व उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवले. तिथे रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. आकाश जाधव यांच्या पश्चात वृध्द आई -वडील,भवजई व एक छोटा पुतण्या आहे.

मोठ्या भावाने ही दीड वर्षापूर्वी केली होती आत्महत्या -:
मयत आकाश जाधव यांच्या भावाने दीड वर्षापूर्वी शेती पिकत नसल्याने आलेल्या आलेल्या नैराष्यातून आत्महत्या केली होती. त्यामुळे हे कुटुंब दुःखातून सावरलेले नसतानाच लहान भाऊ असलेल्या आकाश याने ही आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधार गमावल्याने हे कुटुंब संकटात सापडले आहे.

मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाई तालुक्यातील दुसरी आत्महत्या -:
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ऑक्टोबर महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न अनुरथ काशीद ( वय-४२)यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणाच्या घोषणा देत टाकीवरून उडी मारत आत्महत्या केली होती.त्यानंतर आज आकाश ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या