इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

आताच कोयता बंद करण्याची गरज नाही ; निर्णय होईपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे

 ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल


ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला विश्वास


पंकजाताई मुंडे यांची शरद पवार, साखर संघाच्या अध्यक्षांशी झाली चर्चा



आताच कोयता बंद करण्याची गरज नाही ; निर्णय होईपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे


बीड ।दिनांक २६। 

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर येत्या ५ ते ६ जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे  यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी सविस्तर चर्चा झालेली आहे, त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची गरज नाही, निर्णय होईपर्यंत सर्व काही सुरळीत चालू देणार असल्याचे संघटनांनी ठरवले आहे.


   ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्यात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या लवादाचे निर्णय दरवर्षी होतात, त्यानुसार साखर संघाबरोबर आमच्या दोन चार बैठका देखील झालेल्या आहेत, या बैठकीचा पंकजाताई मुंडे यांनी पूर्ण आढावा घेतलेला असून ऊसतोड कामगार संघटनांची भेटही घेतली आहे. त्याचबरोबर त्यांची शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे.येत्या ५/६ तारखेच्या आसपास यावर निर्णय फायनल होऊन सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. 


*आताच कोयता बंद करण्याची गरज नाही*

---------

५ /६ तारखेच्या बैठकीत जे होईल त्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल. त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची आवश्यकता नाही  ऊसतोड कामगार व मुकादमांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये. ५/६ तारखेपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे. तदनंतर शरद पवार, पंकजाताई मुंडे व साखर संघ संबंधित संघटनांची भेट घेतील आणि पुढच्या गोष्टी ठरवतील असं निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत इतिहासात ऊसतोड कामगारांच्या हिताचाच निर्णय झालेला आहे, गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून हिच पध्दत चालू असल्याने त्याच पध्दतीने यावेळीही निर्णय होईल असा विश्वास ऊसतोड कामगारांना आहे. पंकजाताईंनी देखील ५/६ तारखेच्या आसपास सकारात्मक निर्णय होईल, तोपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे असे सांगितले असल्याचे स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, श्रमिक ऊस तोड कामगार  वाहतूकदार संघटना, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, महाराष्ट्र राज्य ऊसतोड मजूर मुकदम व वाहतूकदार संघटना,जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटना आदी संघटनांनी निवेदनात म्हटले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या