दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

आताच कोयता बंद करण्याची गरज नाही ; निर्णय होईपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे

 ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर 5 जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल


ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला विश्वास


पंकजाताई मुंडे यांची शरद पवार, साखर संघाच्या अध्यक्षांशी झाली चर्चा



आताच कोयता बंद करण्याची गरज नाही ; निर्णय होईपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे


बीड ।दिनांक २६। 

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर येत्या ५ ते ६ जानेवारीपर्यंत सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास ऊसतोड कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे  यांची ज्येष्ठ नेते शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी सविस्तर चर्चा झालेली आहे, त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची गरज नाही, निर्णय होईपर्यंत सर्व काही सुरळीत चालू देणार असल्याचे संघटनांनी ठरवले आहे.


   ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्यात असलेल्या ऊसतोड कामगारांच्या लवादाचे निर्णय दरवर्षी होतात, त्यानुसार साखर संघाबरोबर आमच्या दोन चार बैठका देखील झालेल्या आहेत, या बैठकीचा पंकजाताई मुंडे यांनी पूर्ण आढावा घेतलेला असून ऊसतोड कामगार संघटनांची भेटही घेतली आहे. त्याचबरोबर त्यांची शरद पवार आणि साखर संघाच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे.येत्या ५/६ तारखेच्या आसपास यावर निर्णय फायनल होऊन सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. 


*आताच कोयता बंद करण्याची गरज नाही*

---------

५ /६ तारखेच्या बैठकीत जे होईल त्यानंतर पुढील भूमिका ठरविण्यात येईल. त्यामुळे आताच कोयता बंद करण्याची आवश्यकता नाही  ऊसतोड कामगार व मुकादमांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टीला बळी पडू नये. ५/६ तारखेपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे. तदनंतर शरद पवार, पंकजाताई मुंडे व साखर संघ संबंधित संघटनांची भेट घेतील आणि पुढच्या गोष्टी ठरवतील असं निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत इतिहासात ऊसतोड कामगारांच्या हिताचाच निर्णय झालेला आहे, गोपीनाथराव मुंडे साहेबांपासून हिच पध्दत चालू असल्याने त्याच पध्दतीने यावेळीही निर्णय होईल असा विश्वास ऊसतोड कामगारांना आहे. पंकजाताईंनी देखील ५/६ तारखेच्या आसपास सकारात्मक निर्णय होईल, तोपर्यंत सर्व सुरळीत चालू द्यावे असे सांगितले असल्याचे स्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, श्रमिक ऊस तोड कामगार  वाहतूकदार संघटना, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोडणी मजूर व मुकादम वाहतूकदार संघटना, महाराष्ट्र राज्य ऊसतोड मजूर मुकदम व वाहतूकदार संघटना,जय महाराष्ट्र ऊसतोड कामगार संघटना आदी संघटनांनी निवेदनात म्हटले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....