इमेज
प्रशासकीय गतिमानता, सुसूत्रतेसाठी मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना उपविभागांचे स्वतंत्र विभाग; विभागांची संख्या ४५ होणार सामान्य प्रशासन विभाग प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या ३३ प्रशासकीय विभागांची संख्या ४५ होणार आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज आँफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागात सुसूत्रता आणण्यासाठी पुनर्रचना करण्यात आली. यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होईल, योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार आहे. सध्या मंत्रालयात ३३ प्रशासकीय विभाग होते. यामध्ये एकाच विभागात दोन अथवा तीन उपविभाग होते. उपविभाग दोन किंवा तीन असले तरी विभागाची आस्थापना एकाच विभागप्रमुखांकडे असते. यामुळे मनुष्यबळाच्या वितरणात अडचणी निर्माण होत असत. त्याचबरोबर उपविभागाचे कामकाजाचे स्वरूप भिन्...

परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त

 परळीचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला सेवानिवृत्त



परळी .... प्रतिनिधी.... परळी चे सुपुत्र तथा लातूर येथील जिल्हा न्यायाधीश  कृष्णगोपाल तोतला हे तब्बल 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर 30 नोव्हेंबर रोजी न्यायाधीश या सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांचा लातूर येथे भव्यदिव्य असा निरोप समारंभ पार पडला.

वकिली व्यवसायापासून आपल्या सेवेची सुरुवात करून 1995 मध्ये न्यायाधीश या पदावर रुजू होऊन मुंबई, संभाजीनगर, उल्हासनगर, नागपूर, नांदेड,अशा विविध ठिकाणी न्यायाधीश तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर आपल्या कार्याची एक आगळीवेगळी छाप टाकणारे परळीचे सुपुत्र कृष्ण गोपाल तोतला हे 30 नोव्हेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.लातूर येथील न्याय मंदिराच्या भव्य अशा सभागृहामध्ये त्यांचा निरोप समारंभ पार पडला. 

त्यांच्या या निरोप समारंभाच्या वेळी लातूरचे मुख्य न्यायाधीश,  वकील संघाचे सर्व पदाधिकारी, व वकील संघाचे सदस्य, आणि न्याय मंदिरातील विविध पदावर काम करणारे क्लार्क व कर्मचारी यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते. अत्यंत भावनिक अशा पार पडलेल्या या समारंभात अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून श्री तोतला यांना निरोप दिला. यावेळी मुख्य न्यायाधीश यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले, की श्री तोतला यांचे लातूर येथील योगदान तसेच त्यांनी इतर ठिकाणी केलेले काम हे येणाऱ्या पिढीस नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमास हजेरी लावलेल्या अनेकांचे डोळे पानावले होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या