इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले

 मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले



धारूर, 

धारूर तालुक्यातील आवरगाव येथील  गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्ष 50 यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत आहे या ताना मधून 1 जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेला मराठा आरक्षण देत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून शेतामधील बोरीच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले.

मराठा आरक्षणासाठी कित्येक आंदोलने झाले साखळी उपोषण गावोगावी करत आहेत तरी सरकार मनावर घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने धारूर तालुक्यातील आवरगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्षे 50 यांनी त्यांच्या शेतामध्ये बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे मुख्य कारण हे मराठा आरक्षण असून त्यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे व त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीत त्यांनी असे लिहिले आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत असून आरक्षण देत नसल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे तारखेवर तारीख देत आहेत व २०तारखेपर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी विनंती सरकारला केली आहे तसेच आत्महत्यासाठी मी कोणालाही दोषी ठरवत नसून फक्त सरकारने मराठा आरक्षण द्यावे याकरिता मी माझे जीवन संपवत आहे. असे लिहिले आहे त्यांच्या या जाण्याने आवरगाव हसनाबाद धारूर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पाश्चात्य मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!