इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले

 मराठा आरक्षणासाठी गणेश नखाते यांनी गळफास घेऊन जीवन संपवले



धारूर, 

धारूर तालुक्यातील आवरगाव येथील  गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्ष 50 यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार चाल ढकल करत आहे या ताना मधून 1 जानेवारी सोमवार रोजी दुपारी तीन वाजेला मराठा आरक्षण देत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून शेतामधील बोरीच्या झाडाला गळफास घेत आपले जीवन संपवले.

मराठा आरक्षणासाठी कित्येक आंदोलने झाले साखळी उपोषण गावोगावी करत आहेत तरी सरकार मनावर घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने धारूर तालुक्यातील आवरगाव येथील शेतकरी गणेश विठ्ठलराव नखाते वय वर्षे 50 यांनी त्यांच्या शेतामध्ये बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे मुख्य कारण हे मराठा आरक्षण असून त्यांचा मुलगा व सून उच्चशिक्षित असून त्यांना आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे डोक्यात घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे व त्यांनी आत्महत्या करत असताना चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्या चिठ्ठीत त्यांनी असे लिहिले आहे की मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यापासून सरकार त्यांना तारखेवर तारीख देत असून आरक्षण देत नसल्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे तारखेवर तारीख देत आहेत व २०तारखेपर्यंत आरक्षण देण्यात यावे अशी विनंती सरकारला केली आहे तसेच आत्महत्यासाठी मी कोणालाही दोषी ठरवत नसून फक्त सरकारने मराठा आरक्षण द्यावे याकरिता मी माझे जीवन संपवत आहे. असे लिहिले आहे त्यांच्या या जाण्याने आवरगाव हसनाबाद धारूर सह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पाश्चात्य मुलगा सून व नातवंडे असा परिवार आहे.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या