दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

 राजमाता जिजाऊंचे  कार्य प्रेरणादायी-नारायण सातपुते


राजमाता जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती-भोजराज पालीवाल


शिवसेनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी


परळी (प्रतिनिधी)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती आज 12 जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक येथील जिजामाता उद्यान येथे आज शुक्रवारी राजमाता मासाहेब जिजाऊ  यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ  यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन श्री सातपुते पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री नारायण सातपुते म्हणाले की, आजच्या युवकांना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे. नियोजनबद्ध आखणी, वास्तविकता व ध्येयप्राप्ती अशा अनेक महत्वपूर्ण बाबी त्यांच्यापासून शिकता येतील. आजच्या युवकांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वामी विवेकानंद यांचे तत्वज्ञान अभ्यासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री भोजराज पालीवाल यावेळी म्हणाले की, लहानपणापासूनच जिजाऊंना अन्यायाविरुद्ध चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले.शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकविले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. त्यामुळे, जिजाऊ मातेने बघितलेले हे स्वप्न शिवरायांनी देखील सत्यात उतरविले असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास शिवसेना ऊपजिलाप्रमुख नारायण सातपुते शिवसेना तालुका प्रमुख भोजराज पालीवाल शहर प्रमुख राजेश विभूते विधानसभा समन्वय विधानसभा संघटक सतीश जगताप  तालुका उपप्रमुख महेश केंदे तालुका सचिव प्रकाश सालूखे माजी तालुका प्रमुख जगनाथ सोंलखे बबनराव डिमंडे विजय जाधव बालाजी नागरगोजे यांच्यासह परिसरातील व्यापारी, नागरिक व तमाम शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....