नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती..

इमेज
नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट: 21 जूनला होणार परीक्षा नीट परीक्षा 2026 साठीची नवीन अपडेट राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने जाहीर केली आहे.या अपडेट नुसार आता नीट परीक्षा 21 जून रविवार रोजी घेण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डल वर दिली आहे. नीट परीक्षा 2026 तीन मे रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांच्या हाती या परीक्षेची प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर ही प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले. त्यानुसार राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सीने ही परीक्षा रद्द केले असल्याची घोषणा केली. देशातील 23 लाख हून अधिक विद्यार्थ्यांनी नीट 2026 ची परीक्षा दिली होती. आता अचानक ही परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप झाला. या परीक्षे संदर्भातील तपास नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सीबीआय कडे दिला. सीबीआयच्या तपासामध्ये राजस्थान मधील सिकर जिल्ह्यात त्याचबरोबर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, लातूर अणि पुणे या ठिकाणाहून या परीक्षेची संबंधित संशयितांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर आज नॅशनल टीसी टेस्टिंग एजन्सीने 21 जून...

 निर्भीड पत्रकारांमुळे लोकशाही जिवंत आहे - रानबा गायकवाड


सोनपेठ (प्रतिनिधी) निर्भीड आणि सत्य परखडपणे मांडणाऱ्या पत्रकारामुळे लोकशाही जिवंत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक गायकवाड यांनी केले. ते दर्पण दिनानिमित्त कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयात प्रमुख मार्गदर्शक व व्याख्यान प्रसंगी बोलत होते. महाविद्यालयाच्या वतीने पत्रकार सन्मान सोहळ्याचे   उद्घाटन हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आले.

Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*


     सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या  सांस्कृतिक विभागाकडून 'दर्पण दिना'निमित्त 'पत्रकारांचा सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष परमेश्वरराव कदम तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते म्हणून जेष्ठ पत्रकार व साहित्यिक  रानबा गायकवाड होते. यावेळी मंचावर पत्रकार शिवमल्हार वाघे, सुभाष सावंत, किरण स्वामी, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील हे उपस्थित होते.  


Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*


      यावेळी पुढे बोलताना रानबा गायकवाड म्हणाले की समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी किंवा पुढारीच झाले पाहिजे असे काही नाही.समाजाचे प्रश्न आपल्या लेखनीच्या माध्यमातून सुध्दा सोडवले जाऊ शकतात.तशी दृष्टी मात्र पत्रकारांकडे पाहिजे.देशात पत्रकारांची कशी गळचेपी होत आहे यावरही त्यांनी भाष्य केले.तर अध्यक्षीय भाषणात परमेश्वर कदम यांनी सोनपेठचे पत्रकार कुणाच्याही दबावाखाली काम करीत नाहीत ते  सामाजिक कार्यात पुढे असतात असे सांगितले.याप्रसंगी  सा. सोनपेठ दर्शनच्या विशेष अंकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, नुकत्याच संपन्न झालेल्या 'आव्हान - २०२३' मधील सहभागी महाविद्यालयातील एन.एस.एस. स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. 


Click:■ *मराठी पत्रकार परिषद व परळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा*

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सखाराम कदम यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत सातपुते मांडले. तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बालासाहेब काळे यांनी मानले. यावेळी सर्व पत्रकार बांधव, प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता  सामूहिक राष्ट्रगीताने  झाली.















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या