इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत :

 गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत :

पन्नास जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी


गेवराई......

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना गेवराई येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी 51 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच त्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.


मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे दिनांक 20 जानेवारी रोजी सराटी अंतरवाली इथून मुंबईकडे जात असताना त्यांचे गेवराई तालुक्यात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळ पासून च बच्चे कंपनी पासून वृध्दा पर्यंत मराठा समन्वय रस्त्याच्या दुतर्फा ला उभे होते 

ठिकठिकाणी  कमानी उभारण्यात आल्या होत्या.. तसेच मराठा बांधवांनसाठी पाण्याची सोय देखील करण्यात आली होती .गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचे आगमन झाले यावेळी 50 जेसीबी च्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात आली. महाराजांची आरती झाली व त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो तोफांची सलामी देखील मनोज जरांगे पाटील  यांना देण्यात आली. एक मराठा लाख मराठा या घोषणेने शहर दणाणून  गेले होते.तसेच मराठा बांधवांसाठी कोळगाव या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील आसपासच्या 50 गावांनी भाजी भाकरी पिठलं अशा जेवणाची 20 ठिकाणी  सोय केली  .तसेच ठिक ठिकाणी पाण्याची देखील सोय करण्यात आली होती तर गेवराई शहरांमध्ये मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते तर असंख्य गाड्या ताफा त्यांच्याबरोबर . होता. मराठा बांधवांनी आपल्या खाण्यापिण्याची सोय स्वतःच्या गाडीमध्ये सर्व साहित्य घेऊन मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे कूच करत होते. तर एक मराठा लाख मराठा घोषणेने गेवराई शहरात दणाणून गेले होते भगवे झेंडयाने शहरात भगवे वादळ निर्माण झाले होते.


जय जिजाऊ, जय शिवराय च्या घोषणा ने परिसर दणाणून गेला

मनोज जरांगे पाटील आज मुंबई साठी रवाना झाले असून. लाखोंच्या संख्येने मराठा आज एकवटलेला दिसला उन, वारा ची तमा न बाळगता जरांगे पाटील आपल्या गावात येणार या साठी स्वागत करण्यास उत्सुक होते जरांगे पाटील यांच्या आगमनाने नवं चैतन्य संचारले होते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार लाखो लोक होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!