इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

निवड: हार्दिक अभिनंदन!!!!

 भारत सरकारच्या दुरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी किरण धोंड



परळी वैजनाथ , प्रतिनिधी... 

       येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण धोंड यांची भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत दूरसंचार सल्लागार समितीवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

           भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या शिफारशीतून किरण धोंड यांची भारत सरकारच्या दूरसंचार सल्लागार समितीवर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बाबतचे अधिकृत पत्र दूरसंचार विभागाच्या वतीने किरण धोंड यांना देण्यात आले आहे.  दूरसंचार सल्लागार समितीच्या या पदावर पुढील नविन नियुक्त्या होईपर्यंत त्यांनी कार्यरत राहावे असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षापासून परळीतील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून किरण धोंड सर्वपरिचित आहेत. पक्षाच्या विविध पदाच्या जबाबदाऱ्यावर त्यांनी काम केलेले आहे. भाजपाचे परळी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यात ते सातत्याने सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार सल्लागार समितीवर घेण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट