मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर

 परळीतील फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्त करून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा - अश्विन मोगरकर



परळी वैजनाथ

धरणात पाणी असूनही चार दिवसाआड पाणी पुरवठा व जागोजागी फुटलेल्या पाईपलाईनमुळे भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे नगर परिषदेने पाईपलाईनची दुरुस्ती करून दोन दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. फेब्रुवारीतच शहरातील अनेक भागातील बोर आटू लागले आहेत. 

मात्र परळी वैजनाथ नगर परिषद प्रशासनाला याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. जनतेच्या कररूपी पैश्यातून चालणारी नगर परिषद मात्र नागरिकांना होणाऱ्या त्रासाला उत्तर शोधण्यास असमर्थ आहे. परळी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर वाण धरणात 65 टक्के पाणी साठा आहे. हे पाणी दोन वर्षे पुरेल एवढे आहे. असे असतानाही परळी शहराला 4 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने भर उन्हाळ्यात कृत्रिम पाणीटंचाई नगरपरिषदेकडून केली जात आहे असा आरोप भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केला आहे. परळी शहरात 4-5 दिवसाआड येणारे पाणी आता पुरे होत नाही. त्यात अनेक बोर आटून चालले आहेत. शहरात फुटलेल्या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही.

दोन दिवसाआड अर्धा तास जरी पाणी सोडले तर नागरिकांना दिलासा मिळेल. 4-5 दिवसाआड येणारे 1 तास पाणी किती आणि कुठे भरून ठेवणार? त्यापेक्षा 2 दिवसाआड अर्धा तास पाणी सोडले तर पुरेसे आहे. अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

शहरात फुटलेल्या पाईपलाईन त्वरित दुरुस्त व्हाव्यात. आझाद चौक ते वैद्यनाथ मंदिर या रोडवर, गावभागतील अंबेवेस, प्रिया नगर भगत असेच शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. प्रशासक, अधिकाऱ्यांनी खुर्ची सोडून शहरात फिरून समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. अन्यथा परळीच्या नागरिकांना उन्हाळ्यात वणवण फिरावे लागेल व प्रशासनाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....