दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

 संत सेवाभाया हे मानवतावादी संत -विठ्ठल चव्हाण


संत सेवालाल यांची जयंती मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये यांच्या उपस्थितीत साजरी


परळी /भगवान साकसमुद्रे 


राष्ट्रसंत सेवाभाया महाराज हे मानवतावादी संत असून त्यांच्या अनुयायांनी मानवी हक्क अधिकारांचे संवर्धन करण्यासाठी संघर्ष करावा असे प्रतिपादन गोर सेनेचे नेते अमरावती विभाग  उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण  यांनी केले

संत सेवाभाया यांच्या २८५व्या जयंतीनिमित्त परळी येथील शक्तीकूंज वसाहतीतील श्रीराम मंदिर येथे केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड, तर प्रमुख पाहुणे परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल काठोये , उपमुख्य अभियंता अमित बनकर, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, राजीव  रेड्डी, उदार,कल्याण अधिकारी शरद राठोड ,सुशील राठोड ,कुंदन राठोड, सुरक्षा अधिकारी बी आर अंबाड, कुलकर्णी,बालाजी  पवार, सेवानिवृत्त वि. के पवार आदी प्रमुख उपस्थिती होती

विठ्ठल चव्हाण पुढे म्हणाले की, संत सेवाभायांनी निसर्गाचा तसेच पशुसंवर्धनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून संदर्भ लावला.मानवी हक्क अधिकारांचे साठी संघर्ष करावा. वर्तमान परिस्थितीत शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.

 मान्यवर होते कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी तर आभार जूनियर केमिस्ट प्रसाद जाधव यांनी मानले.

त्यावेळी महिला पारंपरिक वेशात उपस्थित होत्या . महिलनी पारंपरिक बंजारा गीतांचे गायन , नृत्य सादर केली.युवक -युवती पदाधिकारी  मोठया प्रमाणावर उपस्थित होते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....