इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

महाराष्ट्र विद्यालय संकुलात शिवजयंती मोठया उत्साहात

 महाराष्ट्र विद्यालय संकुलात शिवजयंती मोठया उत्साहात 




परळी / प्रतिनिधी


हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र विद्यालय संकुलात मोठ्या उत्साहात

संपन्न झाली याप्रसंगी महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा चे जेष्ठ संचालक सुदामदादा देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. या प्रसंगी संकुलाचे प्राचार्य विनायक राजमाने, उपमुख्याध्यापक मुरलीधर बोराडे,पर्यवेक्षक सुरेंद्र हरदास यांच्यासह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी मुरलीधर बोराडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप प्राचार्य विनायक राजमाने यांनी करत शिव छत्रपतींना  रयतेचे राजा का म्हटले जाते हे विषद केले.यावेळी उपस्थित असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त करत भाषणे केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!