चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका
लिंक मिळवा
Facebook
X
Pinterest
ईमेल
अन्य अॅप्स
-
केतकी चितळेंचे वक्तव्य परिषदेतील व्यक्तिगत मतप्रदर्शन:ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या ठरावात याचा कुठेही संबंध नाही !
बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा खुलासा
ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. समाजाच्या व्यासपीठावरून अशी अनेक मत मतांतरे व्यक्त होतात अशाच प्रकारचे हे वक्तव्य होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही. हे वक्तव्य ठरावाच्या चर्चेत सुद्धा घेतले गेले नाही. ब्राह्मण ऐक्य परिषदेने या वक्तव्याशी सहमती नसल्याचीच भूमिका घेतलेली आहे. हे ऐक्य परिषदेत सर्वसंमत विविध ठरावातून दिसून येईल. त्यामुळे ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका असल्याचा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी खुलासा केला आहे.
कोणत्याही समाजाचे संमेलन वा परिषद असेल तर त्या व्यासपीठावरुन साधक बाधक अशा मुद्द्यांवर स्वतःची मते मांडली जाणारच हे नैसर्गिक आहे. परंतु शेवटी सर्वसंमतीने कोणते ठराव मांडले गेले व मंजूर केले यावरुन त्या संमेलन अथवा परिषदेची समग्र भूमिका ठरली जाते. संपूर्ण संमेलनात कोण काय मत व्यक्त करतो,कोणाची काय व्यक्तीगत मते असतात? ही केवळ विचामंथनाची प्रक्रिया असते. या संपूर्ण संमेलनात कोणा एकाने मांडलेली भूमिका किंवा मत हे संपूर्ण समाजाची भूमिका असते असे निश्चितच नसते. या परिषदेने संपूर्ण मत मतांतरानंतर संमत केलेले ठराव ही खऱ्या अर्थाने त्या परिषदेची किंवा संमेलनाची पर्यायाने समाजाची एकमुखी भूमिका असते. परळीत झालेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेत कोणाचाही विरोध करणारा किंवा अन्य कोणत्याही समाजाच्या न्याय हक्कांवर गदा येईल असा कोणताही ठराव मंजूर झाला नाही.केवळ ब्राह्मण समाज व त्या समाजाला सातत्याने भेडसावणाऱ्या व भारताच्या नागरिकाला मिळालेल्या घटनादत्त अधिकारांच्या माध्यमातून न्याय मिळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका घेण्यात आली. हे सर्व संमत ठरावातून दिसून येते. ही या ऐक्य परिषदेची भूमिका आहे.परंतु कोणाच्या एखाद्याची भूमिका ही सर्व समाजाची भूमिका समजून विनाकारण सकारात्मकतेचे नकारात्मक चित्र तयार करणे हे योग्य ठरणार नाही. केतकी चितळेंचे वक्तव्य हे अन्य समाजबांधवांनी मांडलेल्या असंख्य मतप्रदर्शनासारखेच व्यक्तिगत मतप्रदर्शन होते. ब्राह्मण ऐक्य परिषदेच्या सर्वसंमत ठरावात याचा कुठेही संबंध नाही.ऐक्य परिषदेत ब्राह्मण समाजाची भूमिका कोणाच्याही विरोधात नाही तर समाजाच्या न्याय मागण्यांची एकमुखी भूमिका असल्याचा खुलासा स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केला आहे.
● ब्राह्मण समाज ऐक्य परिषदेतील ठराव... 1) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करुन भरीव आर्थिक निधी द्या.. 2) ब्राह्मण समाजाच्या जमिनीवरील अतिक्रमणासाठी व ब्राह्मण समाजातील व्यक्तीचे होणारे सामाजिक विडंबन बाबत विशेष संरक्षण कायदा पास करावा
3) मुलीच्या मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे स्वागत.. पण मुलांनाही मोफत शिक्षणाची मागणी व उच्च शिक्षण व व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळावी
4) ईनामी जमिनी बाबतीत वर्ग 3 व 2 मधून १ मध्ये वर्ग करावेत व मालकी हक्कात नाव घ्यावे
5) ब्राह्मण समाजाच्या कुळ कायद्याचे पुनर्वावलोकन व्हावे. 6 . विनोबाजी भावे यांच्या भूदान चळवळीत जमिनी दान दिलेल्या ज्या पडीक जमिनी तशाच पडून आहेत त्या जमिनी मूळ मालकांना परत करण्यासाठी विशेष कायदा पारित करावा 7. ब्राह्मण पुरोहित वर्गासाठी मानधन योजना सुरू करावी 8. वेद विद्यालयांना अनुदान व कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम ब्राह्मण समाजातील मुलांसाठी मोफत करावेत 9.ब्राह्मण समाजातील महिलांच्या लघुउद्योग व गृह उद्योगासाठी मायक्रो फायनान्स शून्य टक्के दराने कर्ज योजना मंजूर करावी 10.वेद विद्यालयांना अन्य शाळांप्रमाणे शासकीय अनुदान मंजूर करून कर्मचारी भरती करण्यास मंजुरी द्यावी 11. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. 12. नितीन गडकरी,देवेंद्र फडणवीस यांचा सकल ब्राह्मण समाजाकडून गौरव करण्यात यावा.
परळीत राडा: तुंबळ हाणामारीत एक ठार परळी वैजनाथ, प्रतिनिधी.... तुंबळ हाणामारीत परळीत राडा झाला. यामध्ये एक जण ठार झाल्याची खळबळजनक घटना परळीतील बरकत नगर भागात घडली आहे. कन्या शाळा रोड ते बरकत नगर रस्त्यावर दोन गटात हाणामारी झाली. यात एकाला जीव गमवावा लागला आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार एका समारंभात हा राडा झाल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मयत इसम व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अचानक वाद झाला हा वाद मारामारीपर्यंत पोहचला. यामध्ये एकजण ठार झाला आहे.अल्लाउद्दीन शेख रा.नागापूर असे मयत ईसमाचे नाव आहे.दरम्यान घटनास्थळी प्रचंड जमाव जमा झाला.पोलीस घटनास्थळावर पोहचले असुन परिस्थिती नियंत्रणात आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान या मारामारी मध्ये मयत झालेले इसम अल्लाउद्दीन शेख हे नागापूर येथील रहिवासी असून नागापूर येथे त्यांची पान टपरी आहे. नागापूर परिसरात ते सर्व परिचित असून या हाणामारीत त्यांना आपला जीव गमवावा लागला...
अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर परळी वैजनाथ, प्रतिनिधी..... अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर भिषण आपघात घडला असुन परळीतील तीन युवक गंभीर जखमी झाले. त्यांना अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना यातील दोन युवकांची प्राणज्योत मालवल्याची प्राथमिक माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.एकावर उपचार करण्यात येत आहेत. अंबाजोगाई परळी रस्त्यावर घाटाच्यावर काही अंतरावर आज सायंकाळी 6.45 वा.सुमारास मोटरसायकल व उसाची ट्रॉली यांचा भिषण आपघात घडला. मिळालेल्या प्राथमिक माहीतीनुसार परळीतील तीन युवक मोटरसायकलवरुन परळीकडे येत असताना उसाच्या ट्रॉलीवर धडकुन आपघात घडला. परळी ग्रामीण पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचुन आपघातग्रस्तांना उपचारासाठी हलवण्यात मदतकार्य केले.या आपघात जखमी झालेल्यांमध्ये व्यंकटेश कांदे राहणार बँक कॉलनी,रोहित भराडीया राहणार पद्मावती गल्ली,शुभम धोकटे राहणार इंडस्ट्रियल एरिया परळी यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडू...
*करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय* परळी (दि. 05, प्रतिनिधी) - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा परळीत आल्या असता त्यांच्या गाडीत पोलिसांना पिस्तुल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास परळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून चौकशी चालू असल्याचे समजते आहे. परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार, पुरावे देणार हे दावे तूर्तास तरी फोल ठरले असून करुणा शर्माच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा शर्मा यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे. यावर आता परळी पोलीस काय भूमिका घेतात ...
धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या परळी वैजनाथ , प्रतिनिधी... शहरातील पवनराजे अर्बन निधी या अर्थपेढीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी सात वाजता उघडकीस आली आहे. सध्याच्या परिस्थितीत पतसंस्था, मल्टीस्टेट, पतपेढ्या यांच्या आर्थिक अडचणीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. बीड जिल्ह्यात काही पतसंस्था बाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच आता परळी शहरातील मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या पवन राजे अर्बन निधीचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे. प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंट मध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते. या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात आज दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढ...
केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा.. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा