दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन

 वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन 

रासेयेतून सामाजिक जबाबदारीचे जाणिव होते - प्रा . डॉ . संजय खडप

थोर व्यक्तींचे संस्कार आत्मसाथ करण्यासाठी एन . एस.एस. - प्रा . डॉ . मकरंद जोगदंड


परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  दि . ८ ते १४ फेब्रुवारी  २०२४ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ . रमेश राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले .

यासात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष जलसंवर्धनासाठी पाझर तळे निर्मिती पाणी अडवा पाणी जिरवा - श्रमदान, आधार काटीचा संवाद जेष्ठांशी, महिला मेळावा - बालविवाह प्रथा निर्मूलन आणि प्रतिबंध कायदा जनजागरण, स्वच्छता आभियान उपक्रम राबविण्यात येणार आहेत . शिबिराच्या उद्धाटन संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणुन  सामाजिक जाणिवेच प्रबोधन करणारे कवी डॉ . संजय खडप, प्रा . डॉ . मकरंद जोगदंड ,प्राचार्य अरूण पवार, सरपंच सौ शाहुताई विजय राठोड,  रा. से . यो. चे प्रा . डॉ . माधव रोडे सरंपच विजय राठोड,  प्रा . डॉ . भीमानंद गजभारे, उपसरपंच कुंडलीक जाधव,  नॅकचे प्रा . बी .व्ही. केंद्रे,  मुख्याध्यापक राम राठोड, अदि उपस्थिती होते . 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंधरा महाविद्यालय घटनांदुर साहित्यीक कवी  प्रा . डॉ . संजय खडप हे म्हणाले, " राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व आणि स्वयंसेवांची जबाबदारी या विषयावर आपल्या बहारदार कवीतेतून तरूण युवक - युवतींना ग्रामिण सांस्कृतिची माणुसकी आपलेपणा बिकिट परिस्थिती जगण्याची  जाणीव करू देत ती आत्मसाथ करण्यासाठी रासेयो शिबिरांची गरज असते हे पडऊन दिले . याप्रसंगी  प्रा . डॉ . मकरंद जोगदंड यांनी कवीतेतुन प्रबोधन करत जलव्यवस्थापन, पर्यावरण संर्वधन , लोकशाही व थोर विचारवंताचे विचार शिबिरातून ग्रामविकास साधण्यासाठी करावे असे आवाहन केले . यावेळी कार्यक्रमचा अध्यक्षीय समारोप  प्राचार्य डॉ . रमेश राठोड, तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा . माधव रोडे, सरपंच विजय राठोड, प्रस्ताविक प्रा . डॉ . भिमानंद गजभारे, सुत्रसंचालन विश्वजीत हाके,  तर विशेष सहकार्यडॉ . श्रीहरी गुट्टे, प्रा .दिलीप गायकवाड , प्रा . प्रमोद गित्ते,तर आभार राम फड यांनी मांडले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....