इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन

 वसंतनगर येथे एन . एस . एस . शिबिराचे उद्घाटन 

रासेयेतून सामाजिक जबाबदारीचे जाणिव होते - प्रा . डॉ . संजय खडप

थोर व्यक्तींचे संस्कार आत्मसाथ करण्यासाठी एन . एस.एस. - प्रा . डॉ . मकरंद जोगदंड


परळी -वै: -वसंतनगर येथे राष्ट्रीेय सेवा योजना वैद्यनाथ कॉलेज व  ग्रामपंचायत वंसतनगर यांच्या संयुक्त विद्यमाने  दि . ८ ते १४ फेब्रुवारी  २०२४ या कालवधीत  '' युवकांचा ध्यास ग्राम - शहर विकास '' विशेष युवक - युवती शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ . रमेश राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले .

यासात दिवशीय शिबिरात समाजिक प्रबोधन सह विशेष जलसंवर्धनासाठी पाझर तळे निर्मिती पाणी अडवा पाणी जिरवा - श्रमदान, आधार काटीचा संवाद जेष्ठांशी, महिला मेळावा - बालविवाह प्रथा निर्मूलन आणि प्रतिबंध कायदा जनजागरण, स्वच्छता आभियान उपक्रम राबविण्यात येणार आहेत . शिबिराच्या उद्धाटन संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शक म्हणुन  सामाजिक जाणिवेच प्रबोधन करणारे कवी डॉ . संजय खडप, प्रा . डॉ . मकरंद जोगदंड ,प्राचार्य अरूण पवार, सरपंच सौ शाहुताई विजय राठोड,  रा. से . यो. चे प्रा . डॉ . माधव रोडे सरंपच विजय राठोड,  प्रा . डॉ . भीमानंद गजभारे, उपसरपंच कुंडलीक जाधव,  नॅकचे प्रा . बी .व्ही. केंद्रे,  मुख्याध्यापक राम राठोड, अदि उपस्थिती होते . 

याप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंधरा महाविद्यालय घटनांदुर साहित्यीक कवी  प्रा . डॉ . संजय खडप हे म्हणाले, " राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व आणि स्वयंसेवांची जबाबदारी या विषयावर आपल्या बहारदार कवीतेतून तरूण युवक - युवतींना ग्रामिण सांस्कृतिची माणुसकी आपलेपणा बिकिट परिस्थिती जगण्याची  जाणीव करू देत ती आत्मसाथ करण्यासाठी रासेयो शिबिरांची गरज असते हे पडऊन दिले . याप्रसंगी  प्रा . डॉ . मकरंद जोगदंड यांनी कवीतेतुन प्रबोधन करत जलव्यवस्थापन, पर्यावरण संर्वधन , लोकशाही व थोर विचारवंताचे विचार शिबिरातून ग्रामविकास साधण्यासाठी करावे असे आवाहन केले . यावेळी कार्यक्रमचा अध्यक्षीय समारोप  प्राचार्य डॉ . रमेश राठोड, तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा . माधव रोडे, सरपंच विजय राठोड, प्रस्ताविक प्रा . डॉ . भिमानंद गजभारे, सुत्रसंचालन विश्वजीत हाके,  तर विशेष सहकार्यडॉ . श्रीहरी गुट्टे, प्रा .दिलीप गायकवाड , प्रा . प्रमोद गित्ते,तर आभार राम फड यांनी मांडले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या