प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी

 भारतातील स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि वापराला प्रोत्साहन देणे -डॉ एस आर भुसारी



     परळी प्रतिनिधी- येथील वैद्यनाथ कॉलेज, रसायनशास्त्र विभाग यांच्यामार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्टडी असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे साजरा केला. कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुण्यांचा परिचय विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. केंद्रे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रोफेसर डॉ. एस. आर. भुसारे  यांनी बी.एससी. व एम. एससी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,  आपण विज्ञानाचे विद्यार्थी असल्याने विविध औषधांची माहिती ठेवून सामाजिक दायित्व योग्य पद्धतीने साधले पाहिजे, जेणेकरून सामाजिक जीवन अधिक सोपे व सुखकर होईल. योग्य औषधी समजावूनच सनदशीर मार्गाने घेणे हेच निरोगी जीवनाचे त्रिकाल बाधित सत्य आहे, कारण काही औषधी समाज जीवनावर अपायकारक ठरण्याची शक्यता असते.योग्य औषधी योग्य आजारावर लवकर नियंत्रण करू शकतात त्याबाबतचे विज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेऊन आपली व समाजाची निकोप वाढ करून घेतली पाहिजे.  भारतरत्न सर डॉ.चंद्रशेखर वेंकट रमण यांनी संशोधनाचा पाया रचून विज्ञानाची किमयागार म्हणून सुप्रसिद्ध झालेले आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. राठोड अध्यक्षीय समारोपात म्हणाले की विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, मानवी कल्याणासाठी, विज्ञान तंत्रज्ञानाची वाढ करण्यासाठी, नवयुकांना संशोधनात संधी उपलब्ध करून देण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी आजचा राष्ट्रीय विज्ञान दिन महत्त्वाचा ठरत आहे. आत्मनिर्भर भारत विकसित भारत हाच विज्ञानाचा दृष्टिकोन आहे. कार्यक्रमास डॉ. टी.ए.गीत्ते, प्रोफेसर ए.आर. चव्हाण मॅडम, डॉ. बी.के. शेप, डॉ. व्ही . जे. चव्हाण , प्रा. एस.व्ही. रेणुकदास  व अनेक विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक डॉ एम.जी. लांडगे यांनी केले तर आभार विद्यार्थी ज्ञानेश्वर मुंडे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या