इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे

 सत्ताधारी व्हा ! हा संदेश मान्यवर कांशीरामजी यांनी बहुजन समाजाला दिला- नितीन ढाकणे




परळी/ प्रतिनिधी  


   सत्ताधारी व्हा आणि आपले प्रश्न सोडवा हा मोलाचा संदेश बहुजन समाज पार्टीचे संस्थापक  बहुजन नायक काशीराम यांनी बहुजन समाजाला दिला असे प्रतिपादन अतुल्य महाराष्ट्राचे संपादक नितीन ढाकणे यांनी केले .ते कांशीराम यांच्या 90 व्या जयंतीच्या निमित्ताने पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

    लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आज दिनांक 15 मार्च रोजी कांशीराम यांची जयंती साजरी करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा संपादक नितीन ढाकणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे ज्येष्ठ नेते एडवोकेट डी एल उजगरे होते . पुढे बोलताना नितीन ढाकणे म्हणाले की काशीराम यांनी पंधरा विरुद्ध  पंचाऐशी हा सिद्धांत मांडला. व बहुजन समाज सत्ताधारी होऊ शकतो हे दाखवून दिले. यावेळी बाबासाहेबांचे जाती व्यवस्थेचे निर्मूलन पुस्तक कांशीराम यांच्यासाठी मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.यावेळी डी.एल. उजगरे बोलताना यांच्या विषयी अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच औरंगाबाद येथील जाहीर सभेत कांशीराम यांनी जवळ घेऊन कौतुकाची थाप मारली असे हे सांगितले.

    या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार रानबा गायकवाड ,प्रा .दशरथ रोडे ,दैनिक लोकमत समाचार चे अफसर सय्यद, बसपाचे नागसेन सोनवणे ,एडवोकेट बुद्धभूषण उजगरे, एस.के.गीते आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक फुले -आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले .तर आभार प्रदर्शन रानबा गायकवाड यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....