प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे

 आदिवासी समाज विकास मंचच्या बीड जिल्हाध्यक्ष शंकर गंगाधरे



परळी (प्रतिनिधी)

आदीवासी समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी समाज विकास मंच या संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी परळी येथील सामाजीक कार्यकर्ते शंकर गंगाधरे यांची निवड झाली असुन याबाबत संघटनेच्या पदाधिकार्यांनी नियुक्तीपत्र देवुन बीड जिल्ह्यात संघटनेचे काम करण्याच्या सुचना दिल्या.

 आदिवासी समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष गोकुळ स्वामी,उपाध्यक्ष बागेश्वर इंद्रोले,सचिव सौ.उज्वला साबळे,कार्याध्यक्ष रंजनिकांत बंडलू, सचिन आनंदे,सल्लागार किशोर स्वामी,राधेश्याम शडमल्लु,मार्गदर्शक,कन्हैय्यालाल गुरवे,सदस्य नरेश अंटल्ले,सौ. कामिनी कोडगट्टी,गणेश पवार आदींनी बीड जिल्हाध्यक्ष पदाचे शंकर गंगाधरे यांना नियुक्तीपत्र दिले.आदिवासी समाजासाठी केलेले कार्य हे निश्चितच समाजाच्या कामी आलेले आहे.भविष्यातही सामाजिक कार्याचा वसा व वारसा घेऊन आपण आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टिने सामाजिक कार्य करणार आहात. आतापर्यंत आदिवासी जमातीसाठी केलेले उल्लेखनीय कार्य पाहून व  बिस्सामुंडा,विर एलव्य,राघोजी भांगरे,तंट्या भिल व उमा नाईक, नरसिम्हा रेड्डी या आदिवासी क्रांतीकाऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व आदिवासी समाज विकास मंचचे मराठवाडा अध्यक्ष सतिषजी नाटेकर यांच्या कुशल नेतृत्व, मार्गदर्शक व आदेशान्वये आपली बीड जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असुन आदिवासी समाज विकास मंचच्या माध्यमातून आदिवासी जमातीचा सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक व राजकीय असा सर्वागिण विकास करण्यासाठी व आदिवासी समाज विकास मंचचे कार्य तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मजबुत करण्यासाठी आपल्या पदाचा जास्तीत जास्त वापर करावा असे या नियुक्तीपत्रात नमुद करण्यात आले आहे.यावेळी परळी येथील धनंजय गोतावळे,वैभव राडकर,मधुकर धुमाळ,गजानन मन्नाळे,अंगद गंगाधरे,गजानन गंगाधरे,महेश बळवंत आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या