इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

 महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

   



  पाटोदा /प्रतिनिधी

             पाटोदा शहराचे ग्रामदैवत श्री भामेश्र्वर  मंदिर येथे आज दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 9 ते 11 महाशिवरात्री व संताजी महाराज पुण्यतिथी  निमित्ताने महंत ह.भ.प . राधाताई महाराज सानप ( श्री आईसाहेब देवस्थान महासांगवी) यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे.

      गेल्या 26 वर्षापासून दरवर्षी भामेश्वराची सेवा म्हणून राधाताई न चुकता महाशिवरात्रीला भामेश्र्वर  मंदिर येथे  कीर्तन सेवा करत आहेत . तसेच रात्री ठीक बारा वाजता ब्रह्मवृंदाच्या वतीने भामेश्र्वराची महापूजा होईल . दोन मार्च पासून भक्ती दीदी आळंदी यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू आज शुक्रवारी कथेची सांगता आहे .  शनिवारी 9 मार्च  रोजी सकाळी 9 ते 11 संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भामेश्र्वर मंदिर पर्यंत  संताजी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर 11ते 1 ह.भ प.भक्ती दीदी आळंदी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर  महाप्रसाद होऊन  महाशिवरात्री व संताजी पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भामेश्वर मित्रमंडळ व संताजी युवक मंडळ पाटोदा यांनी केले आहे     

  गुरु आदेशाची परंपरा कायम

        संत मीराबाई आईसाहेब यांच्या देहावसनानंतर 1998 मध्ये या गादीवर भगवान गडाचे महंत भीमसिंह बाबा  महाराज यांनी मला बसवले व तिसऱ्या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त भामेश्र्वर मंदिरामध्ये कीर्तनासाठी जाण्यास सांगितले त्या आदेशाची परंपरा 26 वर्षापासून जोपासत आहे व पुढेही जोपासत राहील. 

- महंत राधाताई महाराज                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या