दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

 महाशिवरात्री निमित्त राधाताई महाराज यांचे कीर्तन

   



  पाटोदा /प्रतिनिधी

             पाटोदा शहराचे ग्रामदैवत श्री भामेश्र्वर  मंदिर येथे आज दिनांक 8 मार्च रोजी सायंकाळी 9 ते 11 महाशिवरात्री व संताजी महाराज पुण्यतिथी  निमित्ताने महंत ह.भ.प . राधाताई महाराज सानप ( श्री आईसाहेब देवस्थान महासांगवी) यांचे अमृततुल्य कीर्तन होणार आहे.

      गेल्या 26 वर्षापासून दरवर्षी भामेश्वराची सेवा म्हणून राधाताई न चुकता महाशिवरात्रीला भामेश्र्वर  मंदिर येथे  कीर्तन सेवा करत आहेत . तसेच रात्री ठीक बारा वाजता ब्रह्मवृंदाच्या वतीने भामेश्र्वराची महापूजा होईल . दोन मार्च पासून भक्ती दीदी आळंदी यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा सुरू आज शुक्रवारी कथेची सांगता आहे .  शनिवारी 9 मार्च  रोजी सकाळी 9 ते 11 संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भामेश्र्वर मंदिर पर्यंत  संताजी प्रतिमेची सवाद्य मिरवणूक निघणार आहे त्यानंतर 11ते 1 ह.भ प.भक्ती दीदी आळंदी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर  महाप्रसाद होऊन  महाशिवरात्री व संताजी पुण्यतिथी सोहळ्याची सांगता होणार तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भामेश्वर मित्रमंडळ व संताजी युवक मंडळ पाटोदा यांनी केले आहे     

  गुरु आदेशाची परंपरा कायम

        संत मीराबाई आईसाहेब यांच्या देहावसनानंतर 1998 मध्ये या गादीवर भगवान गडाचे महंत भीमसिंह बाबा  महाराज यांनी मला बसवले व तिसऱ्या दिवशी महाशिवरात्रीनिमित्त भामेश्र्वर मंदिरामध्ये कीर्तनासाठी जाण्यास सांगितले त्या आदेशाची परंपरा 26 वर्षापासून जोपासत आहे व पुढेही जोपासत राहील. 

- महंत राधाताई महाराज                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....