महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा उत्तम आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय-प्रा. डॉ. विनोद जगतकर
महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा उत्तम आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय-प्रा. डॉ. विनोद जगतकर
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संलग्नित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आंबेजोगाई येथे याच वर्षापासून यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफत असताना प्रमूख व्याख्याते म्हणून डॉ. जगतकर यांनी वरील विचार मांडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट , उपप्राचार्य शिंदे, उपप्राचार्य जाधव, व्याख्यानमालेचे संयोजक प्रा.घोडके, डॉ. मुकुंद राजपंखे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना डॉ जगतकर म्हणाले, *यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत त्यांचे योगदान अत्यंत अमूल्य असून त्यांनीच या राज्याच्या विकासाचा सर्वांगीण पाया रचलेला आहे. शेतीचे औद्योगीकरण, जलसिंचन, नवीन उद्योगांची उभारणी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाची स्थापना, नव बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती, इतर मागासवर्गीयांसाठी सवलती, असे अनेक राज्याच्या विकासावर दुरगामी परिणाम करणारे निर्णय त्यांनी घेतले*. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट म्हणाले, *आमच्या महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले गेले हे आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे. या नावाची प्रतिष्ठा आम्ही जोपासण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत*. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अहिल्या बरूरे यांनी तर आभार प्रदर्शन व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. घोडके यांनी केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा