इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन

 ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन


परळी वैजनाथ, वैजनाथ.......

         परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक  सकल ब्राह्मण समाज परळी वैजनाथ  हे असुन या परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आयोजक म्हणून दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्ही सगळे आयोजक आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे परळीतील सकल ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे.

       सकल ब्राह्मण समाजाकडून पोलीसांना आज निवेदन दिले असुन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.ब्राह्मण ऐक्य परिषदेचे मुख्य आयोजक आम्ही सर्व ब्राह्मण समाज आहोत. कार्यक्रमाचे नियोजन व जबाबदाऱ्या याचा एक भाग म्हणून परळीतील सर्व  ब्राह्मण समाजाने  या परिषदेची  केवळ स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी ही आमच्या समाजाचे नेते बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर दिली होती.त्यामुळे या परिषदेचे आयोजक म्हणून गुन्हा नोंदवून घेत असताना केवळ बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आपण  गुन्हा दाखल केला आहे हे योग्य नाही.या परिषदेचे मुख्य आयोजक आम्ही सर्व ब्राह्मण समाज परळी वैजनाथ आहोत.संपूर्ण आयोजन,नियोजन, संयोजन ब्राह्मण समाज परळी वैजनाथ यांनी केलेले आहे. 

          आयोजक म्हणून बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावरील नाहक दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी सकल ब्राह्मण समाजाकडून मागणी करण्यात आली.यावेळी समाजातील अबाल, वृद्ध,महिलाभगिनी,समाजबांधव  मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!