इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

महासंवाद बैठक: मनोज जरांगे-पाटील

 आचारसंहिता संपणारच आहे;मग यांच्याशी खेटू - मनोज जरांगे पाटलांचा परळीतून सरकारला इशारा




परळी वैजनाथ, प्रतिनिधी

          मराठा समाजाचा शिक्का काय असतो ते 24 तारखेच्या व्यापक बैठकीतून सकल मराठा समाज निर्णय घेऊन दाखवून देईल असे सांगून विनाकारण खोटे गुन्हे व दडपशाही सरकारच्या इशाऱ्यावरून सुरू आहे. ती बंद करा. आचारसंहितेच्या नावाखाली चालवली जाणारी दडपशाही मराठा समाज खपवून घेणार नाही. आचारसंहिता संपणारच आहे मग यांच्याशी खेटू असा सज्जड इशारा  मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील  यांनी सरकारला  परळी येथील महासंवाद बैठकीतून दिला.

             मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज दि. २० रोजी परळी वैजनाथ येथे  महासंवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने आचारसंहितेचे कारण सांगून या महासंवाद बैठकीला परवानगी नाकारण्यात आली होती. यामुळे परळीची मनोज  जरांगे-पाटील  यांची महासंवाद बैठक चर्चेत आली होती. दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने परवानगीसाठी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. त्यानंतर आजच उच्च न्यायालयाने या बैठकीला सशर्त परवानगी दिली. मनोज जरांगे-पाटील  यांचे परळीत जेसीबीने हार घालून भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. 

           बैठकीच्या स्थळी येण्यापूर्वी मनोज जरांगे-पाटील  यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची पूजा करून दर्शन घेतले. परळीच्या मोंढा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महासंवाद बैठकीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या शैलीत सरकारवर ताशेरी ओढले. पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, आंदोलनात व समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या निष्पाप कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. मात्र सरकार वारंवार मराठा समाजाला फसवत असल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी यावेळी केला. गृहमंत्र्यांनी मराठा समाजाबद्दलचा द्वेष करणे सोडून द्यावे. सगे सोयरे परिपत्रक सरकारनेच दिले होते. त्याची अंमलबजावणी केली नाही. या ठिकाणीही सरकारने आपली फसगतच केली आहे असे सांगून मराठा समाजाने आपली एकजूट कायम ठेवावी. आपल्यात फूट पाडण्यासाठी असंख्य प्रयोग केले जात आहेत. मात्र आपली ही एकजूट अभेद्य ठेवावी असे आवाहन मनोज जरांगे-पाटील  यांनी केले.

             बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयोग सुरू आहेत. मात्र आम्हीही कायद्याला मानणारे नागरिक आहोत. न्याय देवता आम्हाला वेळोवेळी न्याय देणारच आहे. आज आचारसंहितेच्या नावाखाली मराठा समाजाला दबावात घेण्याचे आणि दडपशाही करण्याचे धोरण सरकारच्या इशाऱ्यावरून प्रशासन करत आहे. मात्र तुम्ही आमचे बॅनर, पोस्टर काढू शकता मात्र आमची एकजूट तोडू शकणार नाहीत. आज आचारसंहिता  आहे ठिकय ही आचारसंहिता संपणारच आहे. एकदा आचारसंहिता संपू द्या मग यांना खेटू अशा शब्दात त्यांनी परळीतून सरकारला सज्जड इशारा दिला. या महासंवाद बैठकीला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. मोंढा मैदानावर सकल मराठा समाजाने प्रचंड गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या