प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा!

 महातपुरीत पाण्याच्या मोटार काढण्यावरून राडा! 

अख्ख्या गावाने पाच तास रोखला तहसिलदारांचा ताफा  

आ.सोळंकेंनी मध्यस्थी करून तहसीलदारांना काढले सुखरूप बाहेर 



माजलगाव प्रतिनिधी दि.10


तालुक्यातील महातपुरी सुलतानपूर

येथील गोदावरी नदीवर पाणी उपश्यासाठी बसवलेल्या मोटार काढण्यावरून गावकरी आणि तहसीलदारात बुधवार दि 10 रोजी पहाटे मोठा राडा झाला.यादरम्यान आख्या गावाने एक होत सुमारे पाच तास तहसीलदाराचा ताफा रोखून धरला होता.या आणीबाणीच्या प्रसंगी आ.प्रकाश सोळंके यांनी गावकऱ्याची समजूत काढत मध्यस्थी करून तहसीलदारांना सुखरूप बाहेर काढले.


गतवर्षी पावसाळा कमी झाल्याने जिल्ह्यात पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याची जपवनुक करण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. यातच शेतीसाठी नदीकाठ गंगा काठावरून केला जाणारा पाण्याच्या उपशावरही नियंत्रण ठेवणे सुरू केले आहे.याच कामासाठी माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे आपल्या ताफ्यासह महादपुरी  येथे गंगा काठी गेल्या होत्या.यावेळी त्यांनी नदीवर असणाऱ्या विद्युत मोटरी काढण्यासाठी सुरुवात केली.

दरम्यान या बाबीचा गावकऱ्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. दिवस-रात्र नदीतून होणारा वाळू उपसा आपल्याला दिसत नाही. मात्र शेतकरी आपल्या शेतीसाठी थोडं पाणी घेत असल तर आपण आडवे येता.वाढता विरोध होत असल्याने तहसीलदारांनी पोलिसांचा मोठा फौज फाटा यावेळी बोलावून घेतला.विरोध होत असल्याने पोलिसांकडून काही वयोवृद्ध शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली अशी माहिती येथील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितली.यामुळे गावकऱ्यात आणि तहसीलदारात मोठा वाद निर्माण झाला.पहाटे 6 वाजल्या पासून महिला पुरुष आबालवृद्ध गावकऱ्यांनी तहसीलदारांच्या गाडीला गोदा पात्रातच अडवून धरले होते.यावेळी मोठा राडा सुरू झाला.दरम्यान या घटनेची माहिती आ.प्रकाश सोळंके यांना होतात ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गावकऱ्यांची समजूत काढली.व मध्यस्थी करत तहसीलदारांना बाहेर काढले.



सुशील सोळंके,जयदत्त नरवडे यांची मध्यस्थीची भूमिका ठरली महत्त्वाची 


तहसीलदारांनी गोदापात्रात सुमारे 30 ते 40 विद्युत मोटर जप्त करण्याची कार्यवाही चालू होती. अगोदरच शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे.ही बाब लक्षात घेता पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशील सोळंके व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. तहसीलदारांना विनंती केली. प्रसंगी कठोर ही झाले.

परंतु ते ऐकत नसल्याचे पाहून आमदारांना फोन केला.व शेतकऱ्यांच्या जप्त होणाऱ्या मोटार वाचवल्या.त्यामुळे येथील शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या