प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन

 परळी औष्णिक विद्युत केंद्र संच क्र.९ चे काम सुरू करण्यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन




परळी /प्रतिनिधी


             येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन संच क्रमांक ९ सुरू करण्यासाठी शासनाने संच क्रमांक ८ च्या वेळी जमिन संपादित केली असून संच क्रमांक ८ कार्यान्वित झाला आहे. मात्र संच क्रमांक ९ च्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही ती सुरू करण्यासाठी परळीऔष्णिक विद्युत प्रकल्प बचाव कृती समितीच्या वतीने येथील बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल कोठये व उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

               येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सध्या संच क्रमांक ६,७,८ हे कार्यान्वित आहेत. या तीन संचातून ७५० मेगावँट विज निर्मिती केली जाते. येथील संच क्रमांक १ ते ५ बंद करुन स्क्रँप मध्ये काढण्यात आले आहेत. 

 २००७ मध्ये औष्णिक विद्युत केंद्र संच ८ व ९ साठी १२८ हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. यातील संच क्रमांक ८ चे काम पूर्ण होवून  २०१६ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे. परंतु संच क्र. ९ चे काम अद्याप सुरू झालेले नाही. हा संच सुरू झाल्यास परळीतील अनेक बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी रोजगार मिळू शकतो. तसेच उन्हाळ्यात अनेकवेळा पाण्याअभावी परळी औष्णिक विद्युत केंद्र बंद राहते. पाण्याची गरज भागविण्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. हे पाणी कॅनॉलद्वारे सोडल्याने पाण्याची गळती होऊन बरेच पाणी वाया जाते, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच कॅनॉल अनेक ठिकाणी नादुरूस्त असते, कॅनॉलच्या परिसरातील अनेक शेतकरी अवैधरित्या आपल्या सोयीसाठी हे पाणी वापरतात. याचा फटका औष्णिक विद्युत केंद्राला बसतो. यावर उपाय म्हणून परळी केंद्रास ६० कि.मी. पाईपलाईन द्वारे सुरक्षित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने माजलगाव येथील धरणातून कायमस्वरुपी पाईपलाईनद्वारे पाणी आणता येते यासाठी जो खर्च लागणार आहे, डी.पी.आर. २०२१ मध्येच मंजूरीसाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे. त्याची अंदाजित रक्कम २९० कोटी आहे. तरी आपण या बाबीचा विचार करून माजलगाव येथून पाईपलाईनद्वारे खडका येथील बंधाऱ्यात ६० कि.मी. अंदाजित रक्कमेस मान्यता देवून काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करावी. यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी भगवान साकसमुद्रे, सचिव अँड मनोज संकाये निवड करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने मंगळवारी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर व औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल कोठाये यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जा मंत्री, पालकमंत्री बीड, महाव्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती, जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या