प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान: ई केवायसी करुन घ्या -तहसिलदार व्यंकटेश मुंडे

 नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान: ई केवायसी करुन घ्या -तहसिलदार व्यंकटेश मुंडे




परळी वैजनाथ तालुक्यातील शेतकरी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रीभूत पध्दतीने थेट लाभार्थी हस्तांतरण प्रणालीमार्फत वितरण करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाआयटी मार्फत विकसीत संगणक प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात निधी वितरीत सुरू आहे.


ज्या पात्र लाभार्थी यांना रक्कमेचे प्रदान झाले नाही अशा शेतक-यांची यादी गांव निहाय डकविण्यात आली आहे. या यादीमध्ये प्रत्येक लाभार्थी यांच्यासाठी एक स्वतंत्र क्रमांक तयार करण्यात आला असून त्यास "विशिष्ट क्रमांक "असे संबोधण्यात येते. हा क्रमांक घेवून संबधित शेतकरी यांनी जवळच्या "आपले सरकार केंद्र" या ठिकाणी जावून आधार क्रमांकाद्वारे आपली ओळख पटवावयाची (E-KYC) करायचे आहे. आधार प्रमाणीकरणाची सेवा शेतक-यांसाठी निशुल्क असेल (E-KYC) केल्यानंतर सात दिवसात मदतीची रक्कम थेट शेतक-याच्या खात्यात जमा होईल.


तसेच काही लाभार्थी यांचे आधार बँक खात्याशी संलग्न नसल्याने किंवा त्यांचे खाते सुरु नसल्याने बँकेने अशा रक्कम प्रदान केल्या नाहीत, आशा लाभार्थानी त्यांचा आधार क्रमांक. बँकेत किंवा आधार केंद्रात जावून बँक खात्याशी संलग्न / अध्यावत करावा.वरील कार्यपद्धतीचा अवलंब करून नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी अनुदानाची रक्कम प्राप्त करून घ्यावी.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या