परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे -प्रा.डी.बी गायकवाड

 मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे -प्रा.डी.बी गायकवाड 


परळी प्रतिनिधी ---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार मतदान जनजागृति मोहिमे संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डी बी गायकवाड यांनी मतदान करणे हाच लोकशाहीचा आत्मा आहे  असे मत प्रतिपादन केले या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डी के आंधळे, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जे व्हि.जगतकर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. व्हि.जे चव्हाण यांची उपस्थिती होती. यापुढे बोलताना प्रमुख पाहुणे प्रा. गायकवाड यांनी मतदानाद्वारे लोकशाही शासन व्यवस्था मजबूत करता येते. तसेच मतदानाच्या माध्यमातून नागरिकास हवा तो राजकीय पक्ष सत्तेत आणता येतो ,अर्थात हवी ती विचारधारा राजकीय सत्तेच्या माध्यमातून अमलात आणता येते, मतदानाकडे दुर्लक्ष करणे लोकशाहीचा अपमान आहे ही राजकीय उदासीनता लोकशाहीसाठी घातक आहे म्हणून आपल्या आवडीचे सरकार व विचारधारा प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे .मतदानाच्या माध्यमातून वैचारिक क्रांती होऊ शकते .जोपर्यंत देशातील पांढरपेशी, बुद्धीजीवी वर्ग मतदानाबाबत स्वतः जागृत आणि इतरांना जागृत करणार नाही तोपर्यंत या क्रांतीची अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे मत या प्रसंगी व्यक्त केले .त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे व उपप्राचार्य प्रा.डी के आंधळे यांनी मतदानाच्या बाबतीत घटनात्मक तरतुदीवर प्रकाश टाकून प्रत्येक नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाचा अधिकार बजावणे आवश्यक आहे असे मत प्रतिपादन केले. त्याचबरोबर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना निवडणूक मार्गदर्शिका या संदर्भात विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर जे चाटे तर आभार प्रा. मोकळे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!