इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

बारावी निकाल: यंदाही मुलींचीच बाजी

 बारावीचा निकाल 93.37 टक्के! कोकण विभागाची बाजी, मुंबईचा निकाल सर्वात कमी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी हे निकालाची वाट सतत पाहत होते. काही दिवसांपूर्वीच बोर्डाकडून हे स्पष्ट करण्यात आले की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात लागेल. त्यानंतर आता नुकताच बोर्डाकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. आता विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा ही संपलीये. आज बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आज 21 मेला आपला निकाल पाहू शकणार आहेत.
   महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला. एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
यावर्षी एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला आहे. 8782 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर यंदा केवळ एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण मिळवण्यात यश आलं आहे.

दरम्यान पुन्हा एकदा कोकण विभागानं बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त 97.51 टक्के इतका लागला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, छत्रपती संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागला आहे.



12th Result: नऊ विभागीय मंडळ निकाल

Maharashtra Board HSC Result: 


पुणे ९४.४४


नागपूर ९२.१२


छत्रपती संभाजीनगर ९४.०८


मुंबई ९१.९५


कोल्हापूर ९४.२४


अमरावती ९३.००


नाशिक ९४.७१


लातूर  ९२.३६


कोकण ९७. ५१

Maharashtra Board HSC Result: यंदाही मुलींना मारली बाजी

Maharashtra Board HSC Result: मुलींची उत्तीर्ण टक्केवारी 95.44 अशी आहे.


Maharashtra Board HSC Result:  मुलांची उत्तीर्ण टक्केवारी 91.60 अशी आहे.

यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ

12th Result: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

१३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण

एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

Maharashtra Board HSC Result LIVE: बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल? 



• mahresult.nic.in


• http://hscresult.mkcl.org


• www.mahahsscboard.in


• https://results.digilocker.gov.in


• http://results.targetpublications.org



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!