इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

प्रवाशांना विविध सेवा उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे

 प्रवाशांना विविध सेवा उपलब्ध करून द्या-अनिल बोर्डे    


       
                     

   गेवराई:- गेवराई शहरातील बस स्थानकावर विविध सेवा निदर्शनास येत नाहीत त्यावर योग्य ती कार्यवाही करून विविध सेवा पुरविण्यात याव्यात अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायत उपाध्यक्ष व गेवराई ग्राहक मार्गदर्शन केंद्र प्रमुख अनिल बोर्डे यांनी गेवराईतील आगारप्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केलेले आहे व त्यावर प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली निवेदनावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. गेवराई बस स्थानकात थंड पिण्याचे पाणी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी. गेवराई बस स्थानकातून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी बस उपलब्ध नाही. गेवराई येथून भाविक नाशिक व शिर्डी येथे जात असतात तसेच नोकरीनिमित्त गेवराई तालुक्यातील बरीच मंडळी नाशिक येथे आहे. तसेच अनेक विद्यार्थी संगमनेर व लोणी येथे शिक्षणासाठी जात असतात परंतु त्यांना सोयीस्कर अशी बस उपलब्ध नाही. गेवराई आगारातून नाशिक येथे जाण्यासाठी एकही बस उपलब्ध नाही. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाशिक येथे जाण्यासाठी नियमित बस सेवा सुरू करण्याबाबत सर्वांकडून मागणी करण्यात आली. गेवराई बस स्थानकात गाडी पार्किंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे त्यासाठी तात्पुरत्या येणाऱ्या गाड्या यांना पार्किंग दर आकारू नयेत. दिवसभर राहणाऱ्या गाड्यांसाठी अल्प दरा प्रमाणे आकारणी करावी. बस स्थानक स्वच्छता असणे आवश्यक आहे. यासाठी स्वच्छ परिसर ठेवण्यात यावा तसेच स्वच्छता ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. नाथ जल पाणी पंधरा रुपये याप्रमाणे प्रवाशांना देण्यात यावे याबाबत जास्तीचे आकारणी करण्यात येऊ नये. याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. बस स्थानकातील खाद्यपदार्थ विक्रीचे दर पत्रक लावण्यात यावे. जास्तीच्या दराने विक्री होणार नाहीत याबाबत दक्षता घ्यावी. बस स्थानकावरील एसटी बस बाबत प्रवाशांना भ्रमणध्वनीय द्वारे माहिती उपलब्ध केली जात नाही याबाबत योग्य ती कारवाई व्हावी. आगारातील गाड्या सुस्थितीत वेळेवर सोडणे आवश्यक आहे तसेच आपल्या आगारातून नवीन गाड्या मागणी करून उपलब्ध करून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात याव्यात. ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांच्या शाळा जूनमध्ये सुरू होत असून त्यांची गैरसोय होणार नाही  त्यासाठी वेळेवर बसस्थानकातून गाड्या सोडण्यात याव्यात. गेवराई बस स्थानकावरील प्रवेशद्वारावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे व स्थानकातील इतर खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.                                   तरी वरील बाबीची दखल घेऊन याप्रकरणी पंचायत शाखा बीड यांना अवगत करावी ग्राहक पंचायत शाखा गेवराई व आपली संयुक्त बैठक घेऊन आपण केलेल्या कारवाईची माहिती बैठकीत देऊन बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरणे आवश्यक आहे तरी वरील निवेदनावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. सदरील निवेदन देताना ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अनिल बोर्डे गेवराई ग्राहक पंचायत अध्यक्ष प्रा. भानुदास फलके प्रा. ए. ए. चव्हाण इंजिनियर नारायण अवधूत गणेश रामदासी प्रमोद कदम  मोहन राजहंस आर जी थळकर आधी हजर होते










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट