प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार

इमेज
चंद्रपूरच्या प्रदूषणावर ना. पंकजा मुंडे ॲक्शन मोडवर ; विधानसभेतील लक्षवेधीत मांडली परखड भूमिका प्रदूषण नियंत्रणासाठीचा स्वतंत्र आराखडा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविणार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न माझ्यासाठी महत्वाचा मुंबई, दि. २५ - चंद्रपूरसारख्या अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म गोल्सचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला असून तो चंद्रपूरमध्ये पायलट प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे असे स्पष्ट करत हा आराखडा अंतिम करून सभागृहासमोर सादर करण्यात येईल, नागरिकांचे आरोग्य  माझ्यासाठी महत्वाचे आहे असं राज्याच्या  पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज विधानसभेत परखडपणे सांगितलं.   आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमधील कोल वॉशरी, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग आणि थर्मल पॉवर प्रकल्पांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, मी काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचा दौरा केला.या दौऱ्यात मी स्वतः अनेक उद्योग, कोल वॉशरी आणि प्रभावित गावांना भेटी दिल्या. त्या भागातील प्रदूषणाची तीव्रता प्रत्यक्ष पाहिल...

पावसाळ्यापूर्वी सरस्वती नदी व शहरातील नाले सफाई त्वरित करावी - अश्विन मोगरकर

 पावसाळ्यापूर्वी सरस्वती नदी व शहरातील नाले सफाई  त्वरित करावी - अश्विन मोगरकर




परळी वैजनाथ

पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला तरी शहरातील नाले सफाईची कामे नगरपरिषद प्रशासनाने न केल्याने पावसाळ्यात घर दुकानात पाणी शिरून नुकसान होऊ शकते हे टाळण्यासाठी त्वरित नगरपरिषद प्रशासनाने नालेसफाई करावी अशी मागणी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

परळी नगर परिषदेच्या मार्फत दरवर्षी नाले सफाई मोहीम मे महिन्यात केली जाते. परंतु यावर्षी  नगरपरिषदेच्या निवडणुका न झाल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मुख्याधिकारी कधीही शहरात फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याचे दिसून येत नाहीत. नगर परिषद मूलभूत सुविधा नागरिकांना देण्यास असमर्थ ठरत आहे. यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, सरस्वती नदीची सफाई केली जाते. यावर्षी गावभागात असलेली सरस्वती नदी कचरा, प्लास्टिक, झाडेझुडपे व माती दगडांनी अक्षरशः भरून गेली आहे. नगरपरिषदेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक नसल्याने अनेकांनी उघड उघड बांधकामातून उरलेले माती दगड व इतर साहित्य सरस्वती नदीत टाकले आहेत. नदीत वाढलेल्या झाडेझुडपामुळे नदी झाकून गेली आहे. कचऱ्यामुळे डुकरांच्या मुक्त संचारामुळे आजूबाजूच्या नागरिकांचा त्रास वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी सफाई विभागाने अंबेवेस पुलाच्या बाजूला थातूर मातूर सफाई केली. वरवरचा कचरा उचलला परंतु अंबेवेस पासून पुढे कचरा मातीचे ढीग तसेच ठेवल्याने पावसाळ्यात पाणी अडून घरा दारात जाण्याची शक्यता आहे.  

पावसाळ्यापूर्वी केली जाणारी नदी नाले सफाई न केल्याने आगामी पावसाळ्यात अंबेवेससह गावभागतील नागरिकांच्या घर दुकानात पाणी शिरू शकते. होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहील यामुळे त्वरित सरस्वती नदीसह नालेसफाई करावी अशी मागणी भाजपाचे अश्विन मोगरकर यांनी केली आहे.










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या