इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प

 तांडयांना विकासाचा स्पर्श देणाऱ्या पंकजाताईंना शंभर टक्के मतदान देऊन लोकसभेत पाठवू

खा. प्रितमताई मुंडे यांचा गेवराई तालुक्यातील तांडे-वस्त्यांवर प्रचार 


‘जय सेवालाल'च्या घोषणेत बंजारा समाजाने केला विजयाचा संकल्प 


गेवराई । दिनांक ०४ । बंजारा समाजाच्या प्रत्येक गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांना भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकास मंत्री असताना भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, त्यांनी दिलेल्या निधीमुळेच दुर्लक्षित तांड्याना विकासाचा स्पर्श होऊन विकासधारेच्या प्रवाहापासून कोसो दूर राहिलेला बंजारा समाज आता मुख्य प्रवाहात आला आहे. आमच्या तांडयांना विकासाचा स्पर्श दिल्यामुळे जिल्ह्यातील बंजारा समाज शंभर टक्के पंकजाताईंना मतदान देऊ आणि ताईंना लोकसभेत पाठवू असा निर्धार गेवराई तालुक्यातील बंजारा समाजाने केला.


भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील तांडे, वस्त्यांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सुरुवातीला खांडवी तांडा येथे भेट दिल्यानंतर सेवाधाम येथील मंदिरात संत सेवालाल महाराज यांचे दर्शन करून पांगरी तांडा,जातेगाव तांडा, दामू नाईक तांडा,जयराम नाईक तांडा, वसंत नगर तांडा येथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरवसे, शिवराज पवार, प्रा.टी.पी. चव्हाण, जगन अडागळे, बालाजी सातपुते, दीपक सुरवसे, भूषण पवार, विजय राठोड, लक्ष्मण चव्हाण, सुरेश पवार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.


ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यातील सर्व समाज घटकांना न्याय दिला आहे.आपल्या विकास कामांच्या माध्यमातून पंकजाताई प्रत्येक व्यक्तीच्या घरात आणि मनात स्थान निर्माण करून आहेत. ग्रामीण भागातील तांड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या दुर्लक्षित घटकांनी संघर्षाच्या काळात आम्हाला माया दिली आहे. सामान्य लोक आमच्या वाट्याचा संघर्ष वाटून घेतात, आजही या संघर्षाच्या काळात तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहाल असा विश्वास खा. प्रितमताई मुंडे यांनी बोलताना व्यक्त केली. पुढे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व बीड जिल्हा जातपात, मतभेद विसरून ताईंना लोकसभेत पाठवण्यासाठी कामाला लागला आहे. विकासाच्या धोरणला प्राधान्य देऊन पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिलेल्या बीड जिल्ह्याची ही एकजूट अशीच कायम ठेवून पंकजाताईंच्या विजयात मताधिक्याचे योगदान देण्याचे आवाहन याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी केले. 


••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!