परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

आई-वडिलांच्या ताटातुटीत मुलांची तारांबळ

मायबापांनी लाथाडलं; नातेवाईकांनी नाकारलं: तीन चिमुकले सैरभैर 


माजलगाव प्रतिनिधी दि.18


तीन चिमुकल्या मुलांना त्यांच्या नातेवाईकांनी माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर रविवारी पहाटे बेवारस सोडून दिले.ही घटना रविवारी गावकऱ्यांच्या लक्षात आली. पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन अनाथ आश्रमात पोहोचवण्याची व्यवस्था केली आहे.दरम्यान आई-वडिलांच्या बेबनाव ताटातुटीत तीन चिमुकल्यांची मोठी तारांबळ होत आहे.

         याबाबत समजलेली माहिती अशी की,गेवराई तालुक्यातील बोरी पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर जाधव यांचा माजलगाव तालुक्यातील पुंगनी येथील महिलेसोबत आंतरजातीय विवाह 2013 14 साली झाला होता.दरम्यानच्या काळात त्यांना आर्यन(वय 6 वर्षे)अनिकेत (4 वर्षे)व आराध्या (2 वर्ष) अशी तीन मुले झाली.उभयतांत काही दिवसापूर्वी वाद झाल्याची गावकऱ्यात चर्चा आहे.यामुळे मुलांचे वडील ज्ञानेश्वर मोठ्या शहरात वास्तवास गेले,तर आईने लेकरांना नातेवाईकाच्या हवाली सोडून  गेली दरम्यान काही दिवस नातेवाईकांनी मुलांना सांभाळले.परंतु आईबाप तिकडं मजा करत आहेत.आम्ही ही ब्याद का सांभाळायची?अशा भावनेने नातेवाईकांनी या तीन चिमुकल्यांना त्यांच्या आईचे गाव असणाऱ्या माजलगाव तालुक्यातील पुंगनी गावच्या पुलावर  सोडून दिल रविवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान.ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी माजलगाव पोलिसांना याची माहिती दिली.दरम्यान पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन बीडच्या बाल आश्रम ग्रहात त्यांना पोहोचण्याची व्यवस्था केली आहे.या कामी पोलीस कर्मचारी ऍटवाड, चव्हाण मॅडम,कापले मॅडम यांनी काम पाहिले.

       डॉक्टर कैलास काटवटे सरपंच आसाराम शिरसागर गोविंद शिंदे यांनी सदरील चिमुकल्यांना त्यांच्या अंगावर असल्याने तालखेड फाट्यावरील कपड्याच्या दुकानावर तिघांनाही कपडे घेतले खाऊ घेतला त्याचबरोबर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सहकार्य केले त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. 


पोलिसांनी त्या महिलेच्या माहेरी भावाला फोन केले असता भाऊ यांनी सांगितले की 2013 14 झाली तिने आंतरजातीय केल्यापासून आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नसल्याचे सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!