इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा

 सकल चर्मकार समाजाचा पंकजाताई मुंडेंना पाठींबा



माजलगाव, दि.5 : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना बीड सकल चर्मकार समाजाच्यावतीने आज माजलगावात मेळावा घेत जाहीर पाठींबा देण्यात आला. चर्मकार समाजासाठी भाजपा सरकारने अनेक योजना राबविल्या असून त्याचा फायदा समाजातील विविध घटकांना झालेला आहे. त्यामुळे समाजाने एकमुखाने निर्णय घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात महायुतीच्या पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.


माजलगाव येथील वैष्णवी मंगल कार्यालयात हा मेळावा पार पडला. मेळाव्यासाठी माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजलगाव विधानसभा प्रमुख मोहनराव जगताप, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत पाटील, अच्युतराव लाटे, अमरनाथ खुर्पे, कृऊबा सभापती मंगेश तोंडे, संजावनी राऊत, राहुल साळुंके, रविंद्र बोराडे, सुनिता नेटके, शारदा वाघमारे यांची उपस्थिती होती.

माजी मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, केंद्रातील भाजपा सरकार हे गोरगरींबांसाठी काम करणारे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगात उंचावलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा नारा देण्यात आला असून त्यासाठी बीडमधून पंकजाताई मुंडे यांना विजयी करावे, असे आवाहन बबनराव लोणीकर यांनी केले. 

समन्वयक नानासाहेब घोडके यांनी यावेळी चर्मकार समाजाच्या वतीने अनेक मागण्या केल्या. त्यात प्रामुख्याने संत रोहीदास चर्मोद्योग विकास महामंडळ (लीडकॉम) मागील सर्व कर्ज माफ करण्यात यावे. 2024 पर्यंतचे कर्ज प्रकरणे निकाली काढून तात्काळ वाटप करण्यात यावेत. मागासवर्गीयांची अस्वच्छ कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती पुर्ववत चालू करावी. डॉ बाबासाहेब आंबेडकर निर्वाह भत्ता प्रकरणात शहरापासून 7 कि.मी. अंतरावरील अट रद्द करावी. गाव सोडून आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला याचा लाभ मिळावा. जिल्ह्यात संत रविदास सभागृहासाठी जास्तीत जास्त फंड देण्यात यावा. रमाई घरकूल आवास योजनेची रक्कम वाढवण्यात यावी. गटई स्टॉल मागणी अर्ज दोन वर्षापासून प्रलंबित आहेत, त्याला ताबडतोब मंजूरी देऊन वाटप करण्यात यावेत. आदी मागण्या घोडके यांनी केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके, युवक जिल्हाध्यक्ष राजेश जाधव, प्रदेश युवा उपाध्यक्ष अ‍ॅड.गणेश गवळी, अ‍ॅड दत्ता जाधव, सचिन, तालुकाध्यक्ष सुभाष कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष राजू उनवणे, कर्मचारी जिल्हाध्यक्ष सुनील माने, उपाध्यक्ष बालासाहेब गवळी, प्रभाकर भालशंकर, मधुकर ठोसर, संजय भागवत, प्रसाद वाघमोडे, डीगांबर कांबळे, सुभाष कांबळे, सुभाष कांबळे, विक्की मराठे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

----------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या