जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

प्रासंगिक लेख>>>>रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे

रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे सरांचा आज स्मृतीदिन!


आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र वंदन..!!

आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे सरांचं असणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं..!निष्ठावान प्राध्यापक कसा असावा आणि त्या पेशाला पूर्णत्वाने कसे वाहून घ्यावे, हे जर का कुणाला शिकावयाचे असेल तर त्यांनी आमचे आदरणीय

 गुरुवर्य स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या जीवनकार्यावरून शिकावे. सरांचे, मार्गदर्शन आम्हांस लाभले हा आनंद शब्दातीत आहे.अनेक पिढ्यांवर उत्तम संस्कार करून त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या  प्रा.केशवराव देशपांडे सरांना 'रंगकर्मींचे विद्यापीठ'असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.आज आपण जे काही आहोत ते प्रा.केशवराव देशपांडे सरांमुळे आहोत अशी भावना आजही आमच्या मनात जागृत आहे.  साधेपणाने जगताना जीवनावरची,माणूसकीवरची ,

कलेवरची श्रद्धा कशी वाढवावी याचे मार्गदर्शन आमच्या पिढीला लाभले ते सरांकडूनच.

आपल्या व्यासंगी वृत्तीने आणि सर्जनशीलतेने अवघं  रंगभूमीविश्व व्यापून टाकणारे  गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांचा १४ जून  स्मृतिदिन. त्यांच्या जाण्याने नाटयविश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.आमचे सांस्कृतिक छत्र हरपले!

आदरणीय सरांनी आयुष्यातील सर्वाधिक काळ रंगभूमीला दिला होता. त्यांनी या कारकिर्दीमध्ये अत्यंत सुंदर अशा नाट्यकृती आणि अविस्मरणीय आठणींची शिदोरी दिली.विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रिय व्यक्तींच्या हृदयात सर होते आणि असतीलही. नाटयसृष्टीत त्यांना जितका आदर मिळाला, तितकाच इतर क्षेत्रातील लोकांकडूनही मिळाला.

त्यांच्या आयुष्यात नट-दिग्दर्शक म्हणून जितकी ख्याती मिळवली त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ख्याती नाट्यगुरु म्हणून मिळवली.

गुरुजी सोबत तासनतास  नाटय-वाङमयीन गप्पांच्या मैफिली रंगायच्या अशा आठवणी सांगताना  नकळत त्या काळाची सफर घडते.सर आणि वाचन हे एक समीकरणच! आमच्यातही सरांनीच वाचनाची आवड निर्माण केल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते.  आपण काय वाचत आहोत हे सर  उत्साहाने सांगत असत.त्यांची कथन शैली अनुपमच!  त्यांनी लिहिलेले रंगभूमीवरील लेखही नियतकालिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून प्रकाशित झाले आहेत.

शेती,माती, शेतकरी म्हणजे सरांचा जिव्हाळ्याचा विषय. शेतकरी संघटनेचे काम त्यांनी मनोभावे केले.

राज्यातील जनतेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने ते व्यथित होत असत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील असत.

सर  उत्तम अभिनेते होते आणि आम्हां विद्यार्थ्यांवर अपार प्रेम करणारे गॉडफादरही होते. सर कलावंत, गुरू आणि माणूस म्हणूनही मोठे होते.

वेगवेगळ्या विषयांची त्यांना केवळ माहितीच नसे, तर त्याबाबतचे त्यांचे आकलनही आश्चर्यकारक होते. विशेष म्हणजे त्यांची स्मरणशक्ती दांडगी म्हणावी, अशी होती.

आतून-बाहेरून अत्यंत गोड. अर्थात त्यांना समजून घेण्यासाठी  त्यांच्या कसोटीला तुम्हाला उतरावे लागे. त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर ज्ञानाचे भांडार तुम्हाला मिळाले, म्हणून समजा.आम्ही खरोखरच भाग्यवान सरांनी आम्हांला मुक्त हस्ते ज्ञानदान केले.

आदरणीय देशपांडे सरांनी

अफाट लोकसंग्रह जमा केला, ते कल्पनेतही न बसणारे. रंगभूमी समृद्ध करण्यासाठी त्यांची लेखणी-वाणी प्रवाही असायची.रंगभूमी-नाटक हे एक व्रत आहे, ही सरांची भूमिका होती. केवळ आपले नाव चमकविण्यासाठी रंगभूमीवर लुडबूड करायची नाही, हे त्यांनी सर्वांना सांगितले. रंगभूमी ही सामाजिक बांधीलकी असून ती लोकांसाठी करायची असते. ती लोकांच्या उपयोगी पडली पाहिजे, ही भूमिका ते वेळोवेळी मांडायचे. 

 रंगकर्मींचे श्रद्धेय केशवराव देशपांडे सर हे चालते बोलते विद्यापीठ होते.त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

🙏🏵️🙏

✒️    सिद्धार्थ तायडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?