23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

जितना कठीण संघर्ष होगा, जित उतनीही शानदार होगी - लोकसभेच्या निकालावर केलं भाष्य

लोकनेत्याचा स्मृतीदिन ; पंकजाताई मुंडे, खा. डॉ.प्रीतमताई मुंडे कुटुंबियांसह गोपीनाथ गडावर नतमस्तक


मुंडे साहेबांच्या विचारांचा वारसा आणि वंचितांच्या सेवेचा वसा कधीही खाली ठेवणार नाही - पंकजाताई मुंडे

जितना कठीण संघर्ष होगा, जित उतनीही शानदार होगी - लोकसभेच्या निकालावर केलं भाष्य



अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर लोटली अलोट गर्दी

परळी वैजनाथ।दिनांक ०३।
लोकनेते मुंडे साहेब आपल्यातून जावून आज दहा वर्ष झाली. आपण सर्व हे दुःख हृदयात साठवून त्यांच्या संस्कारांवर वागलो. साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, उपेक्षित व पंडितांच्या सेवेसाठी खर्च केलं, आयुष्यभर त्यांनी सर्व सामान्यांसाठी जो संघर्ष केला, जे कष्ट घेतले त्यामुळे ते आपल्या सर्वांच्या कायम लक्षात राहिले. आज त्यांच्या समाधीसमोर मी तुम्हाला वचन देते, मी कधी थकणार नाही, रूकणार नाही, कुणासमोर कधी झुकणार नाही. उतणार नाही, मातणार नाही त्यांच्या विचारांचा वारसा आणि वंचितांच्या सेवेचा वसा कधी टाकणार नाही अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

   लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आज गोपीनाथ गडावर जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते, त्यावेळी उपस्थितांसमोर आपल्या भावना व्यक्त करताना पंकजाताई मुंडे बोलत होत्या. 

  पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, मुंडे साहेबांना जाऊन आज दहा वर्षे झाली पण आजही त्यांचं नुसत नाव घेऊन डोळे बंद केले तर समोर एक हसरा, उमदा आणि प्रत्येकाला आपला वाटणारा चेहरा समोर येतो. एका लोकनेत्याचं जीवनकार्य त्याच्या पश्चातही कसं चालू रहात याचं हे आदर्श उदाहरण आहे. ते आजही आपल्या आचार विचार आणि श्वासात जिवंत आहेत. साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, पिडित व सर्व सामान्य वर्गासाठी खर्ची घातलं. अनेक दुर्लक्षित घटकांना, कार्यकर्त्यांना प्रवाहात आणलं. आमदार खासदार बनविणारी फॅक्टरी असंही त्यांना म्हटलं जात होतं. त्यांच्या विचाराचा वारसा आणि वसा जपण, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं दायित्व आहे. मी कधीही हा वसा खाली ठेवणार नाही.

जितना कठीण संघर्ष होगा...
----
लोकसभेच्या निकालावर बोलताना त्या म्हणाल्या, उद्याच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक करणार यात कसलीही शंका नाही. कन्याकुमारी येथे ज्याठिकाणी मोदींनी ध्यान केलं त्या स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. 'जितना कठीण संघर्ष होगा, जीत उतनीही शानदार होगी' देशाचं राजकारण आता बदलत आहे. देशाला पुढे नेण्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी मोदींचं नेतृत्व आवश्यक आहे.२०४७ पर्यंत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ज्या मुंडे साहेबांनी पक्ष संघटनेसाठी आपलं उभं आयुष्य वेचलं त्यांच्या पुण्यतिथीच्या दुसर्‍या दिवशी सत्तेची हॅटट्रिक होणं यापेक्षा काय मोठं असेल, हे यश मुंडे साहेबांनी पक्षासाठी केलेल्या कष्टाच आहे.

मला निकालाची धाकधूक वाटत विजय निश्चित
-----
बीडचा निकाल काय लागणार याची धाकधूक मला होत नाही कारण माझ्या हृदयातील हुरहूरीची जागा साहेबांच्या जाण्यानं घेतली, यापेक्षा दुसरे मोठे दुःख माझ्या आयुष्यात असू शकत नाही. बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही. प्रत्येकांना सोबत घेऊन काम केलं. मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही. समाजातील कुठल्या वर्गाला, वर्णाला शब्दाने घायाळ केलं नाही. मी नेहमीच जातीपातीच्या पलिकडे जावून सर्व वर्गासाठी काम केलं आणि पुढेही करत राहणार आहे. आज जिल्हयाला पिढी बिघडविणारे नव्हे तर पिढी घडविणारे नेतृत्व हवे आहे, त्यामुळे उद्या माझा निश्चित विजय होणार याची मला खात्री आहे.

कुटुंबियांसह गोपीनाथ गडावर नतमस्तक : भजनातही तल्लीन
-----
पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११.१५ वा. पंकजाताई मुंडे, खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे, आई प्रज्ञाताई मुंडे, बहिण ॲड. यशःश्रीताई मुंडे तसेच जावई गौरव खाडे, मुलगा आर्यमान पालवे, अगस्त्य खाडे व परिवारातील अन्य सदस्यांसह गोपीनाथ गडावर जाऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी धार्मिक भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंकजाताई स्वतः हातात वीणा घेऊन वारकऱ्यांसोबत भजनात तल्लीन झाल्या होत्या. जिल्हयातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंडे साहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठी गर्दी केली होती.
••••







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?