जनता दरबारात प्रश्न लावले मार्गी

इमेज
  आ. पंकजाताई मुंडेंनी जिल्हा ढवळून काढला ; सलग दोन दिवस पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठकीत केली सविस्तर चर्चा परळी वैजनाथ।दिनांक २८। भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या  परळी मुक्कामात संपूर्ण जिल्हा ढवळून काढला. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सलग दोन दिवस मॅरेथॉन बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.    आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या जोरात वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे सध्या राज्यभर संघटनात्मक दौरे करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या मराठवाड्यातील कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत त्या उपस्थित होत्या. याठिकाणी त्यांनी विविध भागातून आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी त्या थेट जिल्हयात दाखल झाल्या. परळी येथे निवासस्थानी त्यांनी सलग दोन दिवस आष्टी-पाटोदा-शिरुरकासार, केज, माजलगाव आणि परळी शहर व ग्रामीण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली. आगामी निवडणु

योगामुळे शाश्वत सुखासोबतच इह-परलोक साधतो !- गुरुकुलात "योगदिन" कार्यक्रमात स्वामी विद्यानंदजी यांचे विचार

योगामुळे शाश्वत सुखासोबतच  इह-परलोक साधतो !- गुरुकुलात "योगदिन" कार्यक्रमात स्वामी विद्यानंदजी यांचे विचार



  परळी वैजनाथ,दि.२१(प्रतिनिधी)--

                         समस्त शारीरिक व्याधी व मानसिक विकारांना नाहीसे करून जीवनात शाश्वत सुखाची प्राप्ती करण्याची गुरुकिल्ली म्हणजेच योगाचे अनुष्ठान होय. योगाच्या आठही अंगांचे श्रद्धेने पालन केल्यास मानवाचा इहलोक व परलोक साधला जातो, असे विचार योग व आयुर्वेदाचे अभ्यासक स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. 

‌                    येथील आर्य समाजातर्फे संचालित नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल  आश्रमात  योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुकुलाचे प्रमुख आचार्य श्री सत्येंद्रजी विद्योपासक यांनी सर्व ब्रह्मचारी  विद्यार्थी, वानप्रस्थी, संन्यासी व कर्मचाऱ्यांना योगासनांचे प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की नियमित योगासने केल्याने शारीरिक रोग व विकार नाहीसे मानवाला उत्तम स्वास्थ्य लाभते.  स्वामी विद्यानंद सरस्वती यांनी प्राणायामाचे विशुद्ध स्वरूप सांगून त्यांच्या विविध प्रकारांचे प्रशिक्षण दिले.  यावेळी ते म्हणाले की प्राण हाच जीवांचा आधारभूत घटक असून जन्माला आल्यापासून  हा आपला खरा सोबती आहे. प्राणायामामुळे मन व शरीराचे सर्व विकार नाहीसे होऊन  आत्मिक बळ वाढीला व  दीर्घायुष्य प्राप्त होते.

      यावेळी शतायुषी संन्यासी स्वामी सोमानंदजी सरस्वती यांनीही योगा विषयी मार्गदर्शन करून योग दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. शेवटी शिक्षक श्री कृष्णा आर्य यांनी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?